शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

परभणी : बोर्डाची परवानगी नसल्याने गुणपत्रक देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:36 IST

ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, ११ जून रोजी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेमध्ये महाविद्यालय निहाय विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात आले़ हे गुणपत्रक घेण्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक जि़प़ कन्या प्रशालेत दाखल झाले तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी पीकशास्त्र विषय घेवून बारावीची परीक्षा दिली आहे़ त्यांचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने नकार दिला़ शिक्षण मंडळाची परवानगी घेतल्यानंतरच गुणपत्रक दिले जाईल, अन्यथा प्रती विद्यार्थी ११०० रुपये भरावे लागतील, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले़ वास्तविक पाहता महाविद्यालयांना पीकशास्त्र विषयासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे़ परंतु, मंडळाची मान्यता घेण्याचे नवीन धोरण सुरू केल्यामुळे सुमारे १७६ महाविद्यालयांना गुणपत्रक मिळाले नाही़ जवळपास २ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गुणपत्रकांपासून वंचित राहिले आहेत़ शिक्षण विभाग महाविद्यालयांची अडवणूक करीत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला़ परवानगी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ मंडळाने देखील या विद्यार्थ्यांचा आॅनलाईन निकाल जाहीर केला आहे, मग गुणपत्रक देण्यास का अडवणूक केली जात आहे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला़ दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबाद