शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बोर्डाची परवानगी नसल्याने गुणपत्रक देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:36 IST

ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, ११ जून रोजी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेमध्ये महाविद्यालय निहाय विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात आले़ हे गुणपत्रक घेण्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक जि़प़ कन्या प्रशालेत दाखल झाले तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी पीकशास्त्र विषय घेवून बारावीची परीक्षा दिली आहे़ त्यांचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने नकार दिला़ शिक्षण मंडळाची परवानगी घेतल्यानंतरच गुणपत्रक दिले जाईल, अन्यथा प्रती विद्यार्थी ११०० रुपये भरावे लागतील, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले़ वास्तविक पाहता महाविद्यालयांना पीकशास्त्र विषयासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे़ परंतु, मंडळाची मान्यता घेण्याचे नवीन धोरण सुरू केल्यामुळे सुमारे १७६ महाविद्यालयांना गुणपत्रक मिळाले नाही़ जवळपास २ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गुणपत्रकांपासून वंचित राहिले आहेत़ शिक्षण विभाग महाविद्यालयांची अडवणूक करीत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला़ परवानगी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ मंडळाने देखील या विद्यार्थ्यांचा आॅनलाईन निकाल जाहीर केला आहे, मग गुणपत्रक देण्यास का अडवणूक केली जात आहे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला़ दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबाद