शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

परभणी : फक्त ५ दलघमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:51 IST

तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.गंगाखेड शहरासह ग्रामीण भगातील काही गावे गोदावरी नदीकाठावर तर बहुतांश गावे डोंगरपट्यात वसलेली आहेत. गेल्या काही वर्षात तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गंगाखेड तालुक्यालाही भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चालू वर्षात अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने व गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाचे दरवाजे नादुरुस्त असल्याने बंधाºयाबरोबर गोदावरी नदीही कोरडीठाक पडली आहे. तर डोंगरपट्यात असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पातही पाण्याची साठवण झाली नाही. आज घडीला मासोळी धरणात मृत साठ्यातील केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने भर हिवाळ्यातच तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे डोंगरातील गावांसह गोदावरी नदीकाठच्याही बहुसंख्य गावांनी विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केले आहेत. यातील काही गावांनी तर टँकरची मागणी पं.स. कार्यालयाकडे नोंदविली आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध पाणी उपसा सुरूच४तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात खळी शिवारातील गोदापात्रापासून ते मुळी बंधाºयापर्यंत साचलेल्या पाण्याचा अवैधरित्या उपसा सुरू आहे.४याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना व कारवाई केली जात असली तरीही अवैध पाणी उपसा सुरूच आहे. येत्या काळात या डोहातील पाणी उपसा थांबला नाही तर गोदावरी नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.४त्याच बरोबर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने कारवाईस सुरूवात करणे आवश्यक आहे.असे केले आहेपाण्याचे नियोजन४मासोळी प्रकल्पात असलेल्या मृत साठ्यातील पाणी केवळ ५.४० दलघमी असल्याने जून २०१९ अखेरपर्यंत गंगाखेड शहरासाठी १.५० दलघमी, गंगाखेड शुगर ०.५० दलघमी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील इसाद, माखणी, पोखर्णी, खोकलेवाडी आदी गावांसाठी ०.५० दलघमी असे एकूण २.५० दलघमी पाणी वापराचे नियोजन प्रशासनाने केले आहे.४यातील २.५० दलघमी पाणी हे गाळ व बाष्पीभवनामध्ये जाईल, असा अंदाज बांधत जून २०१९ अखेर मासोळी प्रकल्पात ०.४० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी लावला.४ त्याच बरोबर मासोळी प्रकल्पातील पाणीसाठा हा जून २०१९ अखेर पर्यंत पुरावा यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शाखाधिकारी उबाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Parabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीparabhaniपरभणीWaterपाणी