शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

परभणी : फक्त ५ दलघमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:51 IST

तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.गंगाखेड शहरासह ग्रामीण भगातील काही गावे गोदावरी नदीकाठावर तर बहुतांश गावे डोंगरपट्यात वसलेली आहेत. गेल्या काही वर्षात तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गंगाखेड तालुक्यालाही भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चालू वर्षात अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने व गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाचे दरवाजे नादुरुस्त असल्याने बंधाºयाबरोबर गोदावरी नदीही कोरडीठाक पडली आहे. तर डोंगरपट्यात असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पातही पाण्याची साठवण झाली नाही. आज घडीला मासोळी धरणात मृत साठ्यातील केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने भर हिवाळ्यातच तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे डोंगरातील गावांसह गोदावरी नदीकाठच्याही बहुसंख्य गावांनी विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केले आहेत. यातील काही गावांनी तर टँकरची मागणी पं.स. कार्यालयाकडे नोंदविली आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध पाणी उपसा सुरूच४तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात खळी शिवारातील गोदापात्रापासून ते मुळी बंधाºयापर्यंत साचलेल्या पाण्याचा अवैधरित्या उपसा सुरू आहे.४याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना व कारवाई केली जात असली तरीही अवैध पाणी उपसा सुरूच आहे. येत्या काळात या डोहातील पाणी उपसा थांबला नाही तर गोदावरी नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.४त्याच बरोबर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने कारवाईस सुरूवात करणे आवश्यक आहे.असे केले आहेपाण्याचे नियोजन४मासोळी प्रकल्पात असलेल्या मृत साठ्यातील पाणी केवळ ५.४० दलघमी असल्याने जून २०१९ अखेरपर्यंत गंगाखेड शहरासाठी १.५० दलघमी, गंगाखेड शुगर ०.५० दलघमी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील इसाद, माखणी, पोखर्णी, खोकलेवाडी आदी गावांसाठी ०.५० दलघमी असे एकूण २.५० दलघमी पाणी वापराचे नियोजन प्रशासनाने केले आहे.४यातील २.५० दलघमी पाणी हे गाळ व बाष्पीभवनामध्ये जाईल, असा अंदाज बांधत जून २०१९ अखेर मासोळी प्रकल्पात ०.४० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी लावला.४ त्याच बरोबर मासोळी प्रकल्पातील पाणीसाठा हा जून २०१९ अखेर पर्यंत पुरावा यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शाखाधिकारी उबाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Parabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीparabhaniपरभणीWaterपाणी