शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कांदा उत्पादनाला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:48 IST

तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़पालम तालुक्यात गोदावरी नदीच्या पट्ट्यातील आरखेड, सोमेश्वर व उमरथडीच्या शिवारात दरवर्षी रबी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जाते़ आरखेड गाव तर मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी २०० एकरवर कांदा पीक घेण्यात आले होते़यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ होत होती़ परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडून गेली आहेत़ कांदा पिकासाठी शेतकºयांनी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केले़ परंतु, या पिकातून शेतकºयांना उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला़कांदा पिकाला भरपूर पाणी लागत असल्याने यावर्षी पाण्याचा ताण पडला आहे़ त्यामुळे पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे कांद्याची वाढ कमी होवून कांद्याचा आकार हा लहान राहिला आहे़ यामुळे कांद्याला बाजारपेठेत मागणी नाही़ त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत़सरसकट मदत देण्याची मागणीदरवर्षी पालम तालुक्यात इतर फळपिकांबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या आरखेड व परिसरातील कांदा उत्पादकांची मदार ही डिग्रस बंधाºयातील पाण्यावर होती़; परंतु, प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकºयाच्या सिंचन व ग्रामस्थांच्या पाण्याचा विचार न करता काही महिन्यांपूर्वी डिग्रस बंधाºयातील संपूर्ण पाणी नांदेडसाठी सोडून दिले़ त्यामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाºया या कांदा उत्पादक शेतकºयांना डिग्रसमधील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यायच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी शेतकºयांना आपल्या पिकांवर पाणी फेरावे लागले़ कृषी विभाग व राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदाFarmerशेतकरी