शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

परभणी : कांदा उत्पादनाला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:48 IST

तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़पालम तालुक्यात गोदावरी नदीच्या पट्ट्यातील आरखेड, सोमेश्वर व उमरथडीच्या शिवारात दरवर्षी रबी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जाते़ आरखेड गाव तर मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी २०० एकरवर कांदा पीक घेण्यात आले होते़यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ होत होती़ परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडून गेली आहेत़ कांदा पिकासाठी शेतकºयांनी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केले़ परंतु, या पिकातून शेतकºयांना उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला़कांदा पिकाला भरपूर पाणी लागत असल्याने यावर्षी पाण्याचा ताण पडला आहे़ त्यामुळे पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे कांद्याची वाढ कमी होवून कांद्याचा आकार हा लहान राहिला आहे़ यामुळे कांद्याला बाजारपेठेत मागणी नाही़ त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत़सरसकट मदत देण्याची मागणीदरवर्षी पालम तालुक्यात इतर फळपिकांबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या आरखेड व परिसरातील कांदा उत्पादकांची मदार ही डिग्रस बंधाºयातील पाण्यावर होती़; परंतु, प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकºयाच्या सिंचन व ग्रामस्थांच्या पाण्याचा विचार न करता काही महिन्यांपूर्वी डिग्रस बंधाºयातील संपूर्ण पाणी नांदेडसाठी सोडून दिले़ त्यामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाºया या कांदा उत्पादक शेतकºयांना डिग्रसमधील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यायच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी शेतकºयांना आपल्या पिकांवर पाणी फेरावे लागले़ कृषी विभाग व राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदाFarmerशेतकरी