शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

परभणी : कांदा उत्पादनाला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:48 IST

तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़पालम तालुक्यात गोदावरी नदीच्या पट्ट्यातील आरखेड, सोमेश्वर व उमरथडीच्या शिवारात दरवर्षी रबी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जाते़ आरखेड गाव तर मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी २०० एकरवर कांदा पीक घेण्यात आले होते़यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ होत होती़ परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडून गेली आहेत़ कांदा पिकासाठी शेतकºयांनी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केले़ परंतु, या पिकातून शेतकºयांना उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला़कांदा पिकाला भरपूर पाणी लागत असल्याने यावर्षी पाण्याचा ताण पडला आहे़ त्यामुळे पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे कांद्याची वाढ कमी होवून कांद्याचा आकार हा लहान राहिला आहे़ यामुळे कांद्याला बाजारपेठेत मागणी नाही़ त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत़सरसकट मदत देण्याची मागणीदरवर्षी पालम तालुक्यात इतर फळपिकांबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या आरखेड व परिसरातील कांदा उत्पादकांची मदार ही डिग्रस बंधाºयातील पाण्यावर होती़; परंतु, प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकºयाच्या सिंचन व ग्रामस्थांच्या पाण्याचा विचार न करता काही महिन्यांपूर्वी डिग्रस बंधाºयातील संपूर्ण पाणी नांदेडसाठी सोडून दिले़ त्यामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाºया या कांदा उत्पादक शेतकºयांना डिग्रसमधील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यायच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी शेतकºयांना आपल्या पिकांवर पाणी फेरावे लागले़ कृषी विभाग व राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदाFarmerशेतकरी