शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी : सव्वा लाख नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:32 IST

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात असून, या योजनेत १ लाख ३५ हजार ६८४ लाभार्थ्यांना आरोग्याचे विमा संरक्षण दिले जाणार आहे़ योजनेंतर्गत परभणी शहरातील सुमारे २३ हजार ६१६ कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वितरित करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात असून, या योजनेत १ लाख ३५ हजार ६८४ लाभार्थ्यांना आरोग्याचे विमा संरक्षण दिले जाणार आहे़ योजनेंतर्गत परभणी शहरातील सुमारे २३ हजार ६१६ कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वितरित करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे़प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना आरोग्यासाठी ५ लाख रुपयांचे प्रतिवर्षाचे संरक्षण देऊ करण्यात आले आहे़ सुमारे १३०० आजारांवरील उपचार या योजनेच्या माध्यमातून मोफत केले जाणार आहेत़ शहरवासियांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ २०११ मध्ये झालेल्या जनगणनेवर आधारित या योजनेत २३ हजार ६१६ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे़ या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या नावाने प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतची उपचाराची सुविधा देण्यात आली आहे़ ही सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक सदस्याला कार्ड वितरित केले जाणार आहे़ हे कार्ड मिळवून घेण्यासाठी पंतप्रधानांकडून आलेले पत्र दाखल करणे आवश्यक आहे़ महापालिकेकडे असे पत्र उपलब्ध झाले असून, शहरात वार्डनिहाय या पत्रांचे वाटप केले जात आहे़लाभार्थी कुटूंबियांना पंतप्रधानांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर या कुटुंबियांनी सीएससी केंद्रांवर जाऊन घरातील प्रत्येक सदस्याच्या आधार क्रमांकासह नोंदणी करणे अपेक्षित आहे़ तसेच या लाभार्थ्यांचे थम्ब इम्प्रेशनही घेतले जाणार आहे़ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, पंतप्रधानांचे पत्र आदी कागदपत्र दाखल केल्यानंतर ही माहिती योजनेच्या वरिष्ठ कार्यालयाकडै पाठविली जाणार असून, त्यानंतर प्रत्येक सदस्याच्या नावे जनआरोग्य योजनेचे कार्ड उपलब्ध होणार आहे़ संपूर्ण कुटूंबाला आरोग्याच्या कक्षेत आणणारी ही योजना असल्याने महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी कुटूंबियांना पंतप्रधानांचे पत्र वाटप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल़ आठवडाभरात सदस्यांचे कार्ड प्राप्त होतील, असा विश्वास मनपाने व्यक्त केला आहे़१३०० आजारांवर होणार उपचार४पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत वेगवेगळ्या १३०० आजारांवरील उपचार मोफत केले जाणार आहेत़ या योजनेत हृदयविकार, कर्करोग, दमा, हाडाचे आजार, पोटाचे विकार अशा विविध आजारांचा समावेश आहे़४या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जातो़ पैशांअभावी अनेक जण उपचार करू शकत नाहीत़ परिणामी, त्यांना यातना सहन कराव्या लागता़ गोरगरीब नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे़केंद्र, राज्याचा वाटा४या योजनेत समावेश असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचे उपचार त्यांच्या आजाराच्या गरजेनुसार दिले जाणार आहेत़४या ५ लाखांमध्ये १ लाख ५० हजार रुपये राज्य शासनाचे आणि ३ लाख ५० हजार रुपये केंद्र शासनाचा वाटा आहे़ केंद्र आणि राज्य मिळून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे़४सध्या या योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे़ कालांतराने पुणे, मुंबईसारख्या शहरांमधील नामवंत खाजगी रुग्णालयांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती मिळाली़महानगरपालिकेतील आरोग्य विभागासह अंगणवाडी सेविका, एनएम, मदतनीस या माध्यमातून पंतप्रधानांकडून आलेली पत्रे लाभार्थी कुटुंबियांना वाटप केले जात आहेत़ या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच शहरातील सीएससी केंद्र चालकांची लवकरच बैठक घेऊन लाभार्थ्यांकडून घ्यावयाची कागदपत्रे आणि आॅनलाईन डाटा फिड करण्यासंदर्भात सूचना देणार आहेत़ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.-सचिन देशमुख, आरोग्य सभापती, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीMayorमहापौरMuncipal Corporationनगर पालिका