शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

परभणी : दीड कोटीचा थांबला व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:18 IST

कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्टÑात आढळल्यानंतर राज्य शासनाने १६ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयांसह आठवडी बाजार, मॉल्समधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.जिल्ह्याचा आर्थिक भार कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. याच व्यवसायावर आधारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात चार दिवसांपासून कृषी मालाची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सद्यस्थितीला बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. या बाजार समितीत मागील आठवड्यात दिवसाकाठी तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल या बाजार समितीत होत होती. ती एक ते सव्वा कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.येथील बाजार समितीत सोयाबिन, तूर, मूग, गहू, ज्वारी, चना या कृषी मालाची आवक होते. या शेतमालाची मागील आठवड्यात बºयापैकी आवक होती. मात्र चार दिवसांपासून ही आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सोयाबिनची आवक सुमारे ५०० क्विंटलने घटली आहे. मागील आठवड्यात सरासरी ७०० क्विंटल सोयाबिनची आवक होत होती. मात्र दोन दिवसांपासून सुमारे २०० ते ३०० क्विंटलच सोयाबिन बाजारपेठेत येत आहे. अशीच परिस्थिती हरभºयाचीही (चना) झाली आहे. मागील आठवड्यात १ हजार क्विंटल आवक झालेल्या हरभºयाची आवक दोन दिवसांपासून मात्र ५०० ते ६०० क्विंटलवर येऊन ठेपली आहे.कोराना या आजाराचा सर्वाधिक परिणाम राज्यस्तरीय बाजारपेठेवर झाला आहे. ठिकठिकाणाहून होणारी शेतमालाची निर्यात बंद झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.शिवाय कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येण्यास शेतकरी पुढे येत नसून, त्याचा परिणाम येथील बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे.निम्म्याने घटले शेतमालाचे दर४बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांत ५० टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीवर बंधने आली आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात ४ हजार ५०० रुपये क्विंटल या दराने सोयाबिनची विक्री झाली. मात्र मागणी नसल्याने मंगळवार आणि बुधवारी या दरात मोठी घट झाली. ३ हजार ४५० ते ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबिनची खरेदी होत आहे. तसेच चन्याच्या दरातही अल्पशी घट झाली आहे. ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असलेला चन्याचा दर सध्या ३ हजार ५०० ते ३ हजारा ६०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.गव्हाची आवक सुरूरबी हंगामातील गव्हाची अनेक भागात काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे गव्हाची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. साधारणत: ४०० ते ५०० क्विंटल गव्हाची येथील बाजारपेठेत आवक झाली होती. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने गव्हाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे गव्हाची आवक वाढणे अपेक्षित आहे. मात्र गव्हाच्या आवकीवरही कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या आडत व्यापाराला यावर्षीही फटका सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात शेतमालाची आवक बºयापैकी वाढली होती. मात्र कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यामुळे शेतकरीही घराबाहेर पडत नसून, या बाजारपेठेतील आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.-मोतीसेठ जैन, अध्यक्ष, आडत व्यापारी असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या