शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

परभणी : दीड कोटीचा थांबला व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:18 IST

कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्टÑात आढळल्यानंतर राज्य शासनाने १६ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयांसह आठवडी बाजार, मॉल्समधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.जिल्ह्याचा आर्थिक भार कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. याच व्यवसायावर आधारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात चार दिवसांपासून कृषी मालाची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सद्यस्थितीला बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. या बाजार समितीत मागील आठवड्यात दिवसाकाठी तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल या बाजार समितीत होत होती. ती एक ते सव्वा कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.येथील बाजार समितीत सोयाबिन, तूर, मूग, गहू, ज्वारी, चना या कृषी मालाची आवक होते. या शेतमालाची मागील आठवड्यात बºयापैकी आवक होती. मात्र चार दिवसांपासून ही आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सोयाबिनची आवक सुमारे ५०० क्विंटलने घटली आहे. मागील आठवड्यात सरासरी ७०० क्विंटल सोयाबिनची आवक होत होती. मात्र दोन दिवसांपासून सुमारे २०० ते ३०० क्विंटलच सोयाबिन बाजारपेठेत येत आहे. अशीच परिस्थिती हरभºयाचीही (चना) झाली आहे. मागील आठवड्यात १ हजार क्विंटल आवक झालेल्या हरभºयाची आवक दोन दिवसांपासून मात्र ५०० ते ६०० क्विंटलवर येऊन ठेपली आहे.कोराना या आजाराचा सर्वाधिक परिणाम राज्यस्तरीय बाजारपेठेवर झाला आहे. ठिकठिकाणाहून होणारी शेतमालाची निर्यात बंद झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.शिवाय कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येण्यास शेतकरी पुढे येत नसून, त्याचा परिणाम येथील बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे.निम्म्याने घटले शेतमालाचे दर४बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांत ५० टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीवर बंधने आली आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात ४ हजार ५०० रुपये क्विंटल या दराने सोयाबिनची विक्री झाली. मात्र मागणी नसल्याने मंगळवार आणि बुधवारी या दरात मोठी घट झाली. ३ हजार ४५० ते ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबिनची खरेदी होत आहे. तसेच चन्याच्या दरातही अल्पशी घट झाली आहे. ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असलेला चन्याचा दर सध्या ३ हजार ५०० ते ३ हजारा ६०० रुपयांवर येऊन ठेपला आहे.गव्हाची आवक सुरूरबी हंगामातील गव्हाची अनेक भागात काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे गव्हाची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. साधारणत: ४०० ते ५०० क्विंटल गव्हाची येथील बाजारपेठेत आवक झाली होती. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने गव्हाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे गव्हाची आवक वाढणे अपेक्षित आहे. मात्र गव्हाच्या आवकीवरही कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या आडत व्यापाराला यावर्षीही फटका सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात शेतमालाची आवक बºयापैकी वाढली होती. मात्र कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यामुळे शेतकरीही घराबाहेर पडत नसून, या बाजारपेठेतील आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.-मोतीसेठ जैन, अध्यक्ष, आडत व्यापारी असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या