शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:29 IST

यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़यावर्षीचा खरीप हंगाम अंतिम चरणात असून, या हंगामातील पिके काढणीला आली आहेत़ जिल्ह्यात मूग बाजारात आला असून, अनेक भागांत सोयाबीनची काढणी सुरू आहे़ तर काही ठिकाणी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठीही येत आहे़ कापसाचे पीकही उत्पादन देण्याच्या अवस्थेत आले आहे़ अनेक भागांतील कापूस परिपक्व झाला असून, शेतकऱ्यांनी वेचणीला सुरुवात केली आहे़ कापसाच्या किमान चार वेचण्या होत असून, संपूर्ण कापूस बाजारात येण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडणार असला तरी इतर पिकांचे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, शेती रबीसाठी तयार केली जात आहे़सोयाबीन, मुगाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रबी हंगामासाठी तयारीला लागतो़ यावर्षी रबी हंगामाची तयारी सुरू झाली असून, एक-दोन मोठे पाऊस झाल्यास प्रत्यक्ष रबीच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ कृषी विभागाने रबी हंगामाच्या लागवडीचे नियोजनही तयार करून ठेवले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात आता रबीच्या हंगामाचे वेध लागले आहेत़ पेरण्यासाठी पैशांची जाडजोड लावली जात आहे़ दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे़त्यामुळे बँकांना हे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ उद्दिष्टानुसार बँका कशा पद्धतीने पीक कर्जाचे वाटप करतात, त्यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़ त्यामुळे रबी हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी गरजू शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे़खरिपात ३० हजार नवीन कर्जदारयावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्ह्यातील बँकांनी ३० हजार ११३ नवीन कर्जदार शेतकºयांना २३२ कोटी २३ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़ त्यामध्ये व्यापारी बँकांनी १४ हजार ७५४ शेतकºयांना १२३ कोटी ९२ लाख तर ग्रामीण बँकेने १५ हजार ३५९ शेतकºयांना १०८ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़कर्जमाफी झालेल्या ३० हजार शेतकºयांना लाभमागील वर्षी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबविली़ या योजनेमध्ये १ लाख ३४ हजार २४२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ कर्जमाफीचा लाभ झाल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामात ३० हजार ९९२ शेतकºयांना परत १ कोटी १४ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाने व्यापारी बँकेकडून नवीन कर्ज घेतलेले नाही़खरिपाचेच : उद्दिष्ट रखडलेलेजिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते़ मात्र पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतला़ खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी होत असताना बँकांनी मात्र केवळ २७ टक्के शेतकºयांनाच कर्ज वाटप केले आहे़ त्यामुळे या शेतकºयांना खरिपाचेच कर्ज कधी मिळेल, अशी चिंता असून, हे कर्ज उचलल्यानंतर रबी हंगामासाठीच्या कर्जाचा विचार होणार आहे़ त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपाच्या कामाला गती द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे़व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट२०१८-१९ च्या रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ त्यात व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट दिले आहे़ जिल्ह्यातील व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे आहे़ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये आणि ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या बँका दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतात की नाही, यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक