शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:29 IST

यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़यावर्षीचा खरीप हंगाम अंतिम चरणात असून, या हंगामातील पिके काढणीला आली आहेत़ जिल्ह्यात मूग बाजारात आला असून, अनेक भागांत सोयाबीनची काढणी सुरू आहे़ तर काही ठिकाणी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठीही येत आहे़ कापसाचे पीकही उत्पादन देण्याच्या अवस्थेत आले आहे़ अनेक भागांतील कापूस परिपक्व झाला असून, शेतकऱ्यांनी वेचणीला सुरुवात केली आहे़ कापसाच्या किमान चार वेचण्या होत असून, संपूर्ण कापूस बाजारात येण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडणार असला तरी इतर पिकांचे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, शेती रबीसाठी तयार केली जात आहे़सोयाबीन, मुगाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रबी हंगामासाठी तयारीला लागतो़ यावर्षी रबी हंगामाची तयारी सुरू झाली असून, एक-दोन मोठे पाऊस झाल्यास प्रत्यक्ष रबीच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ कृषी विभागाने रबी हंगामाच्या लागवडीचे नियोजनही तयार करून ठेवले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात आता रबीच्या हंगामाचे वेध लागले आहेत़ पेरण्यासाठी पैशांची जाडजोड लावली जात आहे़ दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे़त्यामुळे बँकांना हे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ उद्दिष्टानुसार बँका कशा पद्धतीने पीक कर्जाचे वाटप करतात, त्यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़ त्यामुळे रबी हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी गरजू शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे़खरिपात ३० हजार नवीन कर्जदारयावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्ह्यातील बँकांनी ३० हजार ११३ नवीन कर्जदार शेतकºयांना २३२ कोटी २३ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़ त्यामध्ये व्यापारी बँकांनी १४ हजार ७५४ शेतकºयांना १२३ कोटी ९२ लाख तर ग्रामीण बँकेने १५ हजार ३५९ शेतकºयांना १०८ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़कर्जमाफी झालेल्या ३० हजार शेतकºयांना लाभमागील वर्षी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबविली़ या योजनेमध्ये १ लाख ३४ हजार २४२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ कर्जमाफीचा लाभ झाल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामात ३० हजार ९९२ शेतकºयांना परत १ कोटी १४ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाने व्यापारी बँकेकडून नवीन कर्ज घेतलेले नाही़खरिपाचेच : उद्दिष्ट रखडलेलेजिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते़ मात्र पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतला़ खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी होत असताना बँकांनी मात्र केवळ २७ टक्के शेतकºयांनाच कर्ज वाटप केले आहे़ त्यामुळे या शेतकºयांना खरिपाचेच कर्ज कधी मिळेल, अशी चिंता असून, हे कर्ज उचलल्यानंतर रबी हंगामासाठीच्या कर्जाचा विचार होणार आहे़ त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपाच्या कामाला गती द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे़व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट२०१८-१९ च्या रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ त्यात व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट दिले आहे़ जिल्ह्यातील व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे आहे़ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये आणि ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या बँका दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतात की नाही, यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक