शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:29 IST

यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़यावर्षीचा खरीप हंगाम अंतिम चरणात असून, या हंगामातील पिके काढणीला आली आहेत़ जिल्ह्यात मूग बाजारात आला असून, अनेक भागांत सोयाबीनची काढणी सुरू आहे़ तर काही ठिकाणी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठीही येत आहे़ कापसाचे पीकही उत्पादन देण्याच्या अवस्थेत आले आहे़ अनेक भागांतील कापूस परिपक्व झाला असून, शेतकऱ्यांनी वेचणीला सुरुवात केली आहे़ कापसाच्या किमान चार वेचण्या होत असून, संपूर्ण कापूस बाजारात येण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडणार असला तरी इतर पिकांचे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, शेती रबीसाठी तयार केली जात आहे़सोयाबीन, मुगाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रबी हंगामासाठी तयारीला लागतो़ यावर्षी रबी हंगामाची तयारी सुरू झाली असून, एक-दोन मोठे पाऊस झाल्यास प्रत्यक्ष रबीच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ कृषी विभागाने रबी हंगामाच्या लागवडीचे नियोजनही तयार करून ठेवले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात आता रबीच्या हंगामाचे वेध लागले आहेत़ पेरण्यासाठी पैशांची जाडजोड लावली जात आहे़ दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे़त्यामुळे बँकांना हे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ उद्दिष्टानुसार बँका कशा पद्धतीने पीक कर्जाचे वाटप करतात, त्यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़ त्यामुळे रबी हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी गरजू शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे़खरिपात ३० हजार नवीन कर्जदारयावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्ह्यातील बँकांनी ३० हजार ११३ नवीन कर्जदार शेतकºयांना २३२ कोटी २३ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़ त्यामध्ये व्यापारी बँकांनी १४ हजार ७५४ शेतकºयांना १२३ कोटी ९२ लाख तर ग्रामीण बँकेने १५ हजार ३५९ शेतकºयांना १०८ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़कर्जमाफी झालेल्या ३० हजार शेतकºयांना लाभमागील वर्षी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबविली़ या योजनेमध्ये १ लाख ३४ हजार २४२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ कर्जमाफीचा लाभ झाल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामात ३० हजार ९९२ शेतकºयांना परत १ कोटी १४ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाने व्यापारी बँकेकडून नवीन कर्ज घेतलेले नाही़खरिपाचेच : उद्दिष्ट रखडलेलेजिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते़ मात्र पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतला़ खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी होत असताना बँकांनी मात्र केवळ २७ टक्के शेतकºयांनाच कर्ज वाटप केले आहे़ त्यामुळे या शेतकºयांना खरिपाचेच कर्ज कधी मिळेल, अशी चिंता असून, हे कर्ज उचलल्यानंतर रबी हंगामासाठीच्या कर्जाचा विचार होणार आहे़ त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपाच्या कामाला गती द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे़व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट२०१८-१९ च्या रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ त्यात व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट दिले आहे़ जिल्ह्यातील व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे आहे़ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये आणि ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या बँका दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतात की नाही, यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक