शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी नामविस्तार दिन सोहळा :संंविधान वाचेल तरच देश वाचेल- अमोल मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:49 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.शहरातील तथागत मित्रमंडळाच्या वतीने १९ जानेवारी रोजी नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. मोहन मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, शिक्षणाधिकारी वंदनाताई वाव्हुळ, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे अ‍ॅड. धम्मा जोंधळे, शिवाजी साखरे, देवराव खंदारे, यादव भवरे, मधुकर गायकवाड, अनिल खर्गखराटे, लक्ष्मीकांत शिंदे, अशोक धबाले, श्यामराव जोगदंड, मुकुंद भोळे, अशोक कांबळे, शाहीर गौतम कांबळे, केशव जोंधळे, राहुल बलखंडे, सुनिल कांबळे, प्रवीण कनकुटे, रौफ कुरेशी, साहेबराव कदम यांची उपस्थिती होती.सम्यक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत हिवाळे, त्र्यंबक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाuniversityविद्यापीठ