शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:16 IST

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.दोन वर्षापासून पाऊस सरासरी देखील गाठत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर तर होतच आहे. या शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीपातळीतही सातत्याने घट होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला. विशेष म्हणजे परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी परभणी जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती नाजूक झाली आहे. जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या दोन प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा भार आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पात जेमतेम ९ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये ४७ टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. सहा महिन्यांच्या काळात या दोन्ही प्रकल्पांमधील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यात आला. मागील वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. या आरक्षणानुसार जून महिन्यापर्यंत परभणी जिल्ह्यातील शहरी भागाला पाणी उपलब्ध झाले आहे.सद्यस्थितीला पावसाळा सुरु झाला असला तरी प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठा शिल्लक नाही. ९३४ दलघमी क्षमतेच्या येलदरी प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या प्रकल्पात मृतसाठ्यात पाणीसाठा आहे. तर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ३४४.८०० दलघमी क्षमतेचा असून या प्रकल्पामध्येही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय करपरा मध्यम प्रकल्प, मासोळी मध्यम प्रकल्प, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी या गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा शिल्लक नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात हे सर्व प्रकल्प पाण्याने भरले तरच पुढील वर्षीच्या उन्हाळ्याची चिंता मिटणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून मान्सूनचा एक हलका पाऊसही जिल्ह्याता झाला आहे. मात्र ६ महिन्यांपासून जिल्ह्यातील जमीन तापलेली असून भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहिले नाही. सध्या शेतकऱ्यांना पेरण्यासाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे.निम्न दुधनाच्या पाण्याने जिल्ह्याला तारले४यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने पाणीटंचाई अधिकच गंभीर झाली होती. निम्न दुधना प्रकल्पातच बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाचे पाणी परभणी, पूर्णा, सेलू या तीन शहरांसह तीनही तालुक्यांमधील अनेक गावांसाठी वापरण्यात आले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाचा या तालुक्यांना हातभार लागला.४आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी अनेक गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला. आता या प्रकल्पातही पाणीसाठा शिल्लक नसून पावसाळ्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.मृतसाठ्यात उपलब्ध पाणी४जिल्ह्यातील एकाही प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. सर्वच्या सर्व प्रकल्प मृतसाठ्यात आहेत.४येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यात ९१.६२३ दलघमी, निम्न दुधना प्रकल्पात ५५.१९ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १.५७ दलघमी तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये १.७५ दलघमी पाणी मृतसाठ्यात शिल्लक आहे. इतर चारही बंधारे, झरीचा तलाव आणि २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी