शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

परभणी : आवास योजनेच्या लाभार्थ्यांची नव्याने यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:56 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट (जीपीएल) तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी जिल्हा परिषदांना दिले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ न मिळालेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट (जीपीएल) तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी जिल्हा परिषदांना दिले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ न मिळालेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती.या लाभार्थ्यांची कायमस्वरुपी प्रतीक्षा यादीही जाहीर झाली; परंतु, या यादीत पात्र असतानाही आमची नावे आली नाहीत, अशा तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार नवीन कुटुंबांच्या संवर्गनिहाय याद्या तयार करुन त्यास अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदांनी ग्रामीण भागात ३० सप्टेंबरपर्यंत अशा स्वरुपाच्या याद्या तयार कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.केंद्र शासनाने या यादीतील कुटुंबांचा तपशील नोंद करण्यासाठी आवास प्लस हे मोबाईल अ‍ॅपही उपलब्ध करुन दिले आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये कुटुंबांचे सर्व्हेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांची नावे नोंद करावयाची आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्तरावर जमा झालेले अर्ज ग्रामसभेसमोर ठेवून या अर्जांना मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच कायमस्वरुपी यादीमध्ये समाविष्ट न झालेल्या अर्जाचाही या यादीत समावेश करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या आहेत. त्यामुळे वंचित लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शासनाचा निर्णय : मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मंजुरीप्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्यासाठी ग्रामविकास विभागाने मनुष्यबळही उपलब्ध करण्यास मंजुरी दिली आहे. डाटा एंट्री आॅपरेटर, प्रगणक, पर्यवेक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे सूचित केले असून तिन्ही पदांसाठी ठराविक कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. या मनुष्यबळाकडून लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम केले जणार आहे.अधिकाºयांचे राहणार नियंत्रणप्रधानमंत्री आवास योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्याची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व गटविकास अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांची समिती या कामांवर नियंत्रण ठेवणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प संचालक व गटविकास अधिकाºयांनी किमान कुटुंबे सर्व्हेक्षण कालावधीत अचानक तपासणी करण्याचेही सूचित केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरCentral Governmentकेंद्र सरकार