शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

परभणी : एक दलघमी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:01 IST

राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणी पुरवठा केला जातो़ सिद्धेश्वर प्रकल्पामधून या बंधाºयामध्ये पाणी घेतले जाते़ तेथून पुढे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो़ परभणी आणि पूर्णा या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने ३० दलघमी पाणी निम्न दूधना प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्पात राखीव ठेवले आहे़ निम्न दूधना प्रकल्पामध्ये १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १४ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे पाणी आरक्षित करण्यात आले होते़२०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ८ पाणी पाळ्या घेऊन दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले़ परंतु, निम्न दूधना प्रकल्पामधून चारा पिकासाठी कालव्यांना पाणी दिल्याने हे नियोजन फिसकटले आहे़ दरम्यान, परभणी शहराला १ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली़ १़५ दलघमी पाणी राहटी बंधाºयात उपलब्ध झाले होते़ त्यावेळी हे पाणी दीड महिन्यापर्यंत पुरले़ सध्या बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे़ त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन १ दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़राहटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता दीड दलघमी असून, मनपाने एक दलघमीचीच मागणी केली आहे़ पाण्याचे आवर्तन देताना प्रत्यक्षात अधिक पाणी द्यावे लागते़ त्यामुळे संपूर्ण दीड दलघमी पाणी दुसºया आवर्तनात दिले जाईल, अशी अपेक्षा आहे़राहटीतून बेसुमार अवैध उपसापरभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राहटी बंधाºयात पाणी घेतले जाते़ सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे असताना राहटी बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा अवैध उपसा केला जात आहे़ मात्र हा अवैध उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे़ मोटारींनी पाणी उपसा सुरू असतानाही महापालिका आणि जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत असल्याने पिण्याचे पाणी अवैधरित्या उपसा होत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे़ परंतु, या पथकांनीही आतापर्यंत राहटी बंधारा परिसरात कोणतीही कार्यवाही केली नाही़ राहटी बंधाºयातून होणारा अवैध पाणी उपसा थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प