शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

परभणी : एक दलघमी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:01 IST

राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणी पुरवठा केला जातो़ सिद्धेश्वर प्रकल्पामधून या बंधाºयामध्ये पाणी घेतले जाते़ तेथून पुढे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो़ परभणी आणि पूर्णा या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने ३० दलघमी पाणी निम्न दूधना प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्पात राखीव ठेवले आहे़ निम्न दूधना प्रकल्पामध्ये १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १४ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे पाणी आरक्षित करण्यात आले होते़२०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ८ पाणी पाळ्या घेऊन दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले़ परंतु, निम्न दूधना प्रकल्पामधून चारा पिकासाठी कालव्यांना पाणी दिल्याने हे नियोजन फिसकटले आहे़ दरम्यान, परभणी शहराला १ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली़ १़५ दलघमी पाणी राहटी बंधाºयात उपलब्ध झाले होते़ त्यावेळी हे पाणी दीड महिन्यापर्यंत पुरले़ सध्या बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे़ त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन १ दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़राहटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता दीड दलघमी असून, मनपाने एक दलघमीचीच मागणी केली आहे़ पाण्याचे आवर्तन देताना प्रत्यक्षात अधिक पाणी द्यावे लागते़ त्यामुळे संपूर्ण दीड दलघमी पाणी दुसºया आवर्तनात दिले जाईल, अशी अपेक्षा आहे़राहटीतून बेसुमार अवैध उपसापरभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राहटी बंधाºयात पाणी घेतले जाते़ सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे असताना राहटी बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा अवैध उपसा केला जात आहे़ मात्र हा अवैध उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे़ मोटारींनी पाणी उपसा सुरू असतानाही महापालिका आणि जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत असल्याने पिण्याचे पाणी अवैधरित्या उपसा होत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे़ परंतु, या पथकांनीही आतापर्यंत राहटी बंधारा परिसरात कोणतीही कार्यवाही केली नाही़ राहटी बंधाºयातून होणारा अवैध पाणी उपसा थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प