शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एक दलघमी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:01 IST

राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणी पुरवठा केला जातो़ सिद्धेश्वर प्रकल्पामधून या बंधाºयामध्ये पाणी घेतले जाते़ तेथून पुढे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो़ परभणी आणि पूर्णा या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने ३० दलघमी पाणी निम्न दूधना प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्पात राखीव ठेवले आहे़ निम्न दूधना प्रकल्पामध्ये १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १४ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे पाणी आरक्षित करण्यात आले होते़२०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ८ पाणी पाळ्या घेऊन दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले़ परंतु, निम्न दूधना प्रकल्पामधून चारा पिकासाठी कालव्यांना पाणी दिल्याने हे नियोजन फिसकटले आहे़ दरम्यान, परभणी शहराला १ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली़ १़५ दलघमी पाणी राहटी बंधाºयात उपलब्ध झाले होते़ त्यावेळी हे पाणी दीड महिन्यापर्यंत पुरले़ सध्या बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे़ त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन १ दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़राहटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता दीड दलघमी असून, मनपाने एक दलघमीचीच मागणी केली आहे़ पाण्याचे आवर्तन देताना प्रत्यक्षात अधिक पाणी द्यावे लागते़ त्यामुळे संपूर्ण दीड दलघमी पाणी दुसºया आवर्तनात दिले जाईल, अशी अपेक्षा आहे़राहटीतून बेसुमार अवैध उपसापरभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राहटी बंधाºयात पाणी घेतले जाते़ सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे असताना राहटी बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा अवैध उपसा केला जात आहे़ मात्र हा अवैध उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे़ मोटारींनी पाणी उपसा सुरू असतानाही महापालिका आणि जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत असल्याने पिण्याचे पाणी अवैधरित्या उपसा होत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे़ परंतु, या पथकांनीही आतापर्यंत राहटी बंधारा परिसरात कोणतीही कार्यवाही केली नाही़ राहटी बंधाºयातून होणारा अवैध पाणी उपसा थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प