शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:११ हजार मतदारांची नावे यादीत दोनदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:38 IST

मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील मतदार यादीतील ४५ हजार ९३ मतदारांची नावे दुबार आल्याची तक्रार एका राजकीय पक्षाकडून करण्यात आली होती. या तक्रारीतील २ हजार २५५ मतदारांची पडताळणी करणे बाकी असून ४२ हजार ८३८ नावांची आतापर्यंत पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान ओळखपत्रावरील छायाचित्र एकसारखे आढळून आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांतर कोणतेही नाव यादीतून वगळता येत नाही. यामुळे या दुबार नावांची बीएलओस्तरावर घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे व त्याच व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात येणार आहे. पुढील कारवाई निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार केली जाणार आहे. दरम्यान, तक्रार केलेल्या यादीमधील ३१ हजार ९८९ मतदारांचे चेहरे जुळत नाहीत. त्यांचेही फिल्ड व्हेरिफिकेशन होणार आहे. तत्पूर्वीच दुबार नावे आलेल्या ७६३ मतदारांची नावे पूर्वीच यादीतून डिलीट केली आहेत. तक्रार करण्यात आलेल्या यादीतील मतदारांची सखोल तपासणी करण्यात येणार असून तक्रारकर्त्या पक्षाला येत्या ३ ते ४ दिवसांत याबाबतची माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्यात म्हणजेच १८ एप्रिल रोजी होणार असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक विभाग तातडीने कारवाई करणार असून यासाठी सी व्हीजिल नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारी करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्या खर्च नोंदणीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाची नोंद नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यापासून द्यावी लागणार असून प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बँकेतून १ लाख रुपयाच्यावर रक्कम काढली जात असेल तर त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार त्यांना वाहने दिली जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती.२२ भरारी पथकांची स्थापना४आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात २२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून १५ व्हिडिओ सहनिरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. १८ स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ आचारसंहिता पथके स्थापन्यात आली आहेत. खर्चाची पडताळणी करण्यासाठी ४ पथकांची स्थापना करण्यात आली असून यासाठी ४ खर्च सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.२०१४ मध्ये आचारसंहिता भंगाचे ४८ गुन्हे४२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून २६ प्रकरणांमध्ये संंबंधित आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. १२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ३ प्रकरणात ए. बी. फायनल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.५४ संवेदनशील मतदान केंदे्र४परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६४ मतदारकेंद्र असून त्यातील ५४ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने हद्दपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी