शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परभणी महापालिकेने दिली बांधकामे अधिकृत करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:26 IST

शहरातील मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे़ त्यामुळे नागरिकांना अनाधिकृत बांधकामाच्या घरपट्टीपोटी भरावयाच्या शास्तीच्या रकमेतून सुटकारा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे़ परभणी महान

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे़ त्यामुळे नागरिकांना अनाधिकृत बांधकामाच्या घरपट्टीपोटी भरावयाच्या शास्तीच्या रकमेतून सुटकारा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे़परभणी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला़ मागील अनेक वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षण झाले नसल्याने घरपट्टीपोटी मनपाला मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत होते़ या पार्श्वभूमीवर मागील वर्षी महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केले़ या सर्वेक्षणानंतर मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार शहरातील मालमत्तांचे कर निश्चित करण्यात आले़ हे कर ठरवित असताना अनाधिकृत बांधकामांना घरपट्टीच्या दुप्पट दंड आकारण्याची तरतूद आहे़ त्यामुळे अनाधिकृत बांधकामधारकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती़दरम्यान, या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनाधिकृत मालमत्तांना अधिकृत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे़ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ क नुसार अनाधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रश्मीत संरचना म्हणून घोषित केली जाणार आहे़ या निर्णयानुसार परभणी शहरातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात बांधकाम देखरेख अभियंते आणि आर्किटेक्ट यांची बैठक घेण्यात आली़ शासनाच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासाठी अनाधिकृत बांधकाम धारकांकडून महानगरपलिकेने अर्ज मागविले आहेत़हे अर्ज महापालिकेच्या आवक विभागात विहित नमुन्यात स्वीकारले जाणार आहेत़ ११ डिसेंबर २०१७ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीत अनाधिकृत बांधकाम धारकांकडून बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज स्वीकारले जातील़ मनपाचा परवाना असलेल्या आर्किटेक्ट मार्फत महापालिका कार्यालयातून १५० रुपयांचा अर्ज उपलब्ध करून दिला जाईल़ या अर्जासोबत कागदपत्रांची यादी दिली आहे़ सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपलब्ध अर्ज दाखल झाल्यानंतर या बांधकामांना नियमित केले जाणार आहे़६० टक्के बांधकामे अनाधिकृतमहानगरपालिकेच्या नोंदीनुसार एक वर्षापूर्वी शहरात ३३ हजार मालमत्ता होत्या़ मागील वर्षी या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला़ सर्वेक्षणाअंती मालमत्तांची संख्या ७३ हजार एवढी झाली आहे़ शहरात ६० टक्के बांधकामे अनाधिकृत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ महापालिका अनाधिकृत बांधकामांसंदर्भात सर्वेक्षण करीत आहे़ बांधकाम परवाना न घेता बांधकाम करणे किंवा बांधकाम परवान्यातील नकाशात नमूद केलेल्या बांधकामापेक्षा अधिक झालेले बांधकाम अनाधिकृत ठरविले जाते़अधिकाºयांच्या मार्गदर्शनाची गरज४बांधकाम परवाना काढणे तसेच नियमित करणे या संदर्भात नागरिकांना प्रक्रियेची माहिती नाही़ त्यामुळे बांधकामे नियमित करण्यासाठी लागणाºया प्रक्रियेची इत्यंभूत माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी जनजागरण करावे, अशी मागणी होत आहे.दंडाच्या रकमेपासून मिळू शकते सुटकाशहरामध्ये घरपट्टी वसूल करताना अनाधिकृत बांधकामांसाठी १०० टक्के दंड (शास्ती) लावण्याची तरतूद आहे़ त्यामुळे जेवढी घरपट्टी तेवढाच दंड मनपा प्रशासन वसूल करू शकते़ काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने घरपट्टीमध्ये वाढ केली आहे़ कोणत्या अनाधिकृत मालमत्तांना किती शास्ती लावायची याविषयी शासन निर्णय असले तरी अनाधिकृत मालमत्तांना दंड लागणार आहे़ महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने परभणी शहरातील नागरिकांची दंडाच्या रकमेपासून सुटका होऊ शकतो़