शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:48 IST

गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षीही पूर्ण पावसाळ्यात केवळ दोन महिने पाऊस पडला. तर सप्टेंबर, आॅक्टोबर ही दोन महिने पूर्णत: कोरडी गेली आहेत. ५० टक्के कमी पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात राज्य शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला. तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन ठिकाणी गोदावरी नदीपात्रात उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता १४.८७ दलघमी आहे. तर मुदगलची ११.४८ दलघमी एवढी क्षमता आहे. मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी हे बंधारे मार्च महिन्यापूर्वीच कोरडे पडत आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने ढालेगाव बंधारा जायकवाडीच्या पाण्यामुळे १०० टक्के भरला गेला होता. मात्र आॅगस्ट नंतर पाऊसच पडला नसल्याने पावसाळ्यातच बंधाºयाचे पाणी ५० टक्के पेक्षा कमी झाले होते. याचा फटका खरीप पिकांसोबत रबी हंगामातील पिकांनाही बसला होता. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत बंधाºयात पाण्याचा बराच उपसा सिंचनासाठी झाला. त्याच बरोबर काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मुदगल येथील बंधारा तर सध्या मृत साठ्यात आहे.त्याच बरोबर ढालेगाव येथील बंधाºयातही मार्च महिन्यात पाणी पातळी ३९०.१०० मीटर म्हणजेच ३.२४ टक्केच आहे. या पाण्यावर पाथरी शहराचा पुढील तीन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे; परंतु, मृतसाठ्यात असलेल्या या बंधाºयातून शेती सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. त्याच बरोबर २ हजार २४२ हेक्टवरील पिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.जायकवाडीच्या: पाण्यावरच मदार४तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात दोन बंधारे आहेत. त्याच बरोबर जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून गेला आहे. त्यामुळे या भागात बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्या तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांना पाणी मिळत नाही.४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागात मोठे सिंचन होते. आॅक्टोबर महिन्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी या भागात एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. या पाण्यावर ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याच बरोबर कालव्यातील पाण्यामुळे सिंचनाच्या स्त्रोताला पाणी राहिले आहे.४त्यामुळे बºयाच अंशी जायकवाडीच्या पाण्याने पाथरी तालुक्याला तारले असल्याचे दिसून येत आहे.सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रांंतर्गत ढालेगाव, रामपुरी, निवळी, पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव, बानेगाव, मंजरथ तर माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव, पुरुषोत्तम पुरी, जायक्याचीवाडी, सादोळा, गंगामसला, सावंगी यासह इतर गावातील २ हजार २४२ हेक्टर शेती सिंचनाखाली येते; परंतु, मार्च महिन्यात या बंधाºयात केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया पाथरी व माजलगाव तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater scarcityपाणी टंचाई