शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:48 IST

गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षीही पूर्ण पावसाळ्यात केवळ दोन महिने पाऊस पडला. तर सप्टेंबर, आॅक्टोबर ही दोन महिने पूर्णत: कोरडी गेली आहेत. ५० टक्के कमी पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात राज्य शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला. तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन ठिकाणी गोदावरी नदीपात्रात उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता १४.८७ दलघमी आहे. तर मुदगलची ११.४८ दलघमी एवढी क्षमता आहे. मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी हे बंधारे मार्च महिन्यापूर्वीच कोरडे पडत आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने ढालेगाव बंधारा जायकवाडीच्या पाण्यामुळे १०० टक्के भरला गेला होता. मात्र आॅगस्ट नंतर पाऊसच पडला नसल्याने पावसाळ्यातच बंधाºयाचे पाणी ५० टक्के पेक्षा कमी झाले होते. याचा फटका खरीप पिकांसोबत रबी हंगामातील पिकांनाही बसला होता. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत बंधाºयात पाण्याचा बराच उपसा सिंचनासाठी झाला. त्याच बरोबर काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मुदगल येथील बंधारा तर सध्या मृत साठ्यात आहे.त्याच बरोबर ढालेगाव येथील बंधाºयातही मार्च महिन्यात पाणी पातळी ३९०.१०० मीटर म्हणजेच ३.२४ टक्केच आहे. या पाण्यावर पाथरी शहराचा पुढील तीन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे; परंतु, मृतसाठ्यात असलेल्या या बंधाºयातून शेती सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. त्याच बरोबर २ हजार २४२ हेक्टवरील पिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.जायकवाडीच्या: पाण्यावरच मदार४तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात दोन बंधारे आहेत. त्याच बरोबर जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून गेला आहे. त्यामुळे या भागात बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्या तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांना पाणी मिळत नाही.४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागात मोठे सिंचन होते. आॅक्टोबर महिन्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी या भागात एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. या पाण्यावर ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याच बरोबर कालव्यातील पाण्यामुळे सिंचनाच्या स्त्रोताला पाणी राहिले आहे.४त्यामुळे बºयाच अंशी जायकवाडीच्या पाण्याने पाथरी तालुक्याला तारले असल्याचे दिसून येत आहे.सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रांंतर्गत ढालेगाव, रामपुरी, निवळी, पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव, बानेगाव, मंजरथ तर माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव, पुरुषोत्तम पुरी, जायक्याचीवाडी, सादोळा, गंगामसला, सावंगी यासह इतर गावातील २ हजार २४२ हेक्टर शेती सिंचनाखाली येते; परंतु, मार्च महिन्यात या बंधाºयात केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया पाथरी व माजलगाव तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater scarcityपाणी टंचाई