शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

परभणी : कामाच्या शोधार्थ मजुरांचे शहराकडे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:31 IST

अल्प पावसामुळे शेती पिकली नाही़ त्यामुळे कामाच्या शोधार्थ तालुक्यातील मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे मजूर शहराकडे धाव घेत आहेत़ तर दुष्काळी परिस्थितीने संकटात सापडलेले अल्पभूधारक शेतकरी ऊस तोडणीच्या कामाला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): अल्प पावसामुळे शेती पिकली नाही़ त्यामुळे कामाच्या शोधार्थ तालुक्यातील मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे मजूर शहराकडे धाव घेत आहेत़ तर दुष्काळी परिस्थितीने संकटात सापडलेले अल्पभूधारक शेतकरी ऊस तोडणीच्या कामाला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे़पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना लागवड खर्चापेक्षाही कमी उत्पन्न मिळाले़ यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे़ तालुक्यातील पर्जन्यमान घटल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ शासन दरबारी वार्षिक सरासरीनुसार ६० टक्के पाऊस तालुक्यात झाल्याची नोंद आहे़; परंतु, तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव, मासोळी प्रकल्पात पाणी साचले नाही़ आॅक्टोबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी परतीच्या पावसाने हजेरी लावली नसल्याने रबी हंगामाच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़रबी हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत़ शेतमजूरी करून आपल्या कुटूंबाची उपजीविका भागविणाºया शेतमजुरांबरोबर अल्पभूधारक शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे़मजुरीची कामे करणाºया मजुरांनी कामाच्या शोधार्थ आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे़ मात्र तालुक्यात कुठलेही मोठे उद्योग नसल्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरांकडे लोंढे जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ शेतीत उत्पन्न न मिळाल्याने अल्पभूधारक शेतकरी आपल्यावर ओढावलेले आर्थिक संकट टाळण्यासाठी ऊस तोडणीच्या कामाला जाण्यासाठी ऊस तोडणी मुकादमाकडून उचल घेत आहेत़ गेल्या पाच वर्षांपासून जेमतेम पडणाºया पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे तसेच भविष्यात भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे़ त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई व मजुरांना गावातच काम उपलब्ध होईल, यासाठी पावले उचलावीत़ नोव्हेंबर महिन्याची वाट न पाहता गोदावरी नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी मुळी बंधारा तसेच धारखेड-गंगाखेड रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात कच्चा बंधारा उभारून पाणी आडवावे, अशी मागणी होत आहे़दुष्काळाची दाहकता वाढलीगंगाखेड तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस ही पिके शेतकºयाच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ विशेष म्हणजे शेतकरीच अडचणीत असल्याने शेतीवर अवलंबून असलेल्य मजुरांच्या हातालाही काम मिळत नाही़ त्यामुळे शेतकºयांबरोबरच मजुरांच्याही अडचणीत भर पडली आहे़ त्यामुळे मजुरांना आपल्या कुटूंबाची उपजीविका भागविण्यासाठी कामे मिळविण्यासाठी घर सोडण्याची वेळ आली आहे़रोहयोही : ठप्पगंगाखेड पंचायत समिती कार्यालयाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत शौच खड्डे, शौचालय, घरकूल, तुती लागवड, बांधावरील वृक्ष लागवड, फळ लागवडीची सुमारे २७२६ कामे मंजूर आहेत़ मात्र यातील शौच खड्डे १५०, शौचालय १२५, घरकूल २८०, तुती लागवड ८० असे अंदाजे ६३५ कामे सुरू असल्याची माहिती मिळाली़याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध व्हावीत, यासाठी तालुक्यातील सुमारे ३० हजार मजुरांनी नोंदणी केली आहे़ मंजूर कामे सुरू होत नसल्याने नोंदणी केलेल्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती ओढालवली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ