शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:17 IST

जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़२०१८-१९ च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस आदी शेतमालाची शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाने खरेदी न केल्यास व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड व एक वर्षाचा कारावास ठोठावण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती व व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़शासनाने आदेश देऊनही व्यापाºयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांचा माल खरेदी करणे सुरू होते़ या प्रकरणी तालुक्यातील सोन्ना व इतर गावांतील शेतकºयांनी बाजार समिती प्रशासनाकडे लेखी तक्रार करून आमचा माल कमी दराने खरेदी केला जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिले़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात व्यापारी, आडते, खरेदीदार व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत सहाय्यक निबंधक पी़एस़ राठोड यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकाचे वाचन केले़ त्यानंतर या बैठकीत हमीभाव दरावर धान्य खरेदी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली; परंतु, व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला़त्यानंतर व्यापाºयांकडून जोपर्यंत परभणी जिल्ह्यात शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येत नाही, तोपर्यंत बाजार समितीतील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़या बैठकीस बाजार समितीचे सचिव विलास मस्के, शेतकरी प्रतिनिधी किशोर ढगे, अनंत कदम, रामभाऊ आवरगंड, व्यापाºयांच्या वतीने मोतीलाल जैन, संदीप भंडारी, रमेश देशमुख, गोविंदप्रसाद आजमेरा, गोविंदराज मणियार, गोविंद कदम, रमेश जाधव आदींसह ४५ व्यापाºयांची उपस्थिती होती़शेतकरी सापडले अडचणीतआॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सण-उत्सव असतात़ या काळात शेतकºयांना पैशाची निकड असते़ त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांतून मिळालेल्या पैशातून शेतकरी सण उत्सव साजरे करतात; परंतु, शासनाने दिलेल्या निर्णयाचे व्यापाºयांकडून पालन केले जात नाही़ तर शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी करण्यात येत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल कोठे विक्री करावा? या चिंतेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़ त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी नाफेडकडून जिल्ह्यात तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती