शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:17 IST

जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़२०१८-१९ च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस आदी शेतमालाची शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाने खरेदी न केल्यास व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड व एक वर्षाचा कारावास ठोठावण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती व व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़शासनाने आदेश देऊनही व्यापाºयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांचा माल खरेदी करणे सुरू होते़ या प्रकरणी तालुक्यातील सोन्ना व इतर गावांतील शेतकºयांनी बाजार समिती प्रशासनाकडे लेखी तक्रार करून आमचा माल कमी दराने खरेदी केला जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिले़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात व्यापारी, आडते, खरेदीदार व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत सहाय्यक निबंधक पी़एस़ राठोड यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकाचे वाचन केले़ त्यानंतर या बैठकीत हमीभाव दरावर धान्य खरेदी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली; परंतु, व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला़त्यानंतर व्यापाºयांकडून जोपर्यंत परभणी जिल्ह्यात शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येत नाही, तोपर्यंत बाजार समितीतील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़या बैठकीस बाजार समितीचे सचिव विलास मस्के, शेतकरी प्रतिनिधी किशोर ढगे, अनंत कदम, रामभाऊ आवरगंड, व्यापाºयांच्या वतीने मोतीलाल जैन, संदीप भंडारी, रमेश देशमुख, गोविंदप्रसाद आजमेरा, गोविंदराज मणियार, गोविंद कदम, रमेश जाधव आदींसह ४५ व्यापाºयांची उपस्थिती होती़शेतकरी सापडले अडचणीतआॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सण-उत्सव असतात़ या काळात शेतकºयांना पैशाची निकड असते़ त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांतून मिळालेल्या पैशातून शेतकरी सण उत्सव साजरे करतात; परंतु, शासनाने दिलेल्या निर्णयाचे व्यापाºयांकडून पालन केले जात नाही़ तर शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी करण्यात येत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल कोठे विक्री करावा? या चिंतेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़ त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी नाफेडकडून जिल्ह्यात तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती