शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

परभणी : पाण्यासाठी मनपावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:57 IST

शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.खानापूर नगर हा शहरापासून दूर अंतरावर असलेला भाग असून या भागात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेने या परिसरासाठी जलवाहिनी टाकली असली तरी अद्याप या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले नसल्याने नळांना पाणी येत नाही. हातपंपांची पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईत भर पडली आहे. दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी २८ जानेवारी रोजी सकाळी खानापूरनगर येथून मोर्चाला सुरुवात केली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेला हा मोर्चा वसमत रस्त्यावरुन महापालिकेवर पोहचला. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.खानापूरवासियांचा प्रश्न४खानापूर नगर भागात जलवाहिनी नसल्याने येथील नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. जलवाहिनीचे काम अर्धवट असून हातपंपही आटल्याने पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीagitationआंदोलन