शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

परभणी : कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:56 IST

तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.पालम शहराजवळ अर्धा कि. मी. अंतरावरून लेंडी नदी वाहते. या नदीच्या पात्रात पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर जुनाट आणि अतिशय कमी उंचीचा पूल असल्याने पाऊस पडताच हा रस्ता बंद पडतो. यावर्षी ३० वेळा हा रस्ता बंद पडला आहे. या रस्त्यावर फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, खुरलेवाडी तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेट आहे.पाऊस पडताच पुलावर पाणी येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडत आहे. सलग आठ दिवस हा रस्ता बंद पडून पालम शहराचा संपर्क तुटला होता. याच नदीवर पालम ते पुयणी या रस्त्यावरही शासनाने नवीन पुलाचे बांधकाम केले आहे.अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे नवीन पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी ही पाऊस पडताच पुलावर दोन ते तीन फूट पाणी येऊन रस्ता बंद पडत आहे. या रस्त्यावरील पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर, नाव्हा, खडी या गावांची वाहतूक ठप्प होत आहे. दोन्ही ठिकाणी कमी उंचीचे पूल असून दरवर्षी पावसाळ्यात या १२ गावांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढे होऊनही शासकीय यंत्रणा मात्र नवीन पुलांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात १२ गावांना मोठ्या प्रमाणामध्ये संकटाचा सामना करावा लागत आहे.प्रशासन : गप्पच४यावर्षीच्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे. परिणामी बारा ते तेरा गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.४विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षापासून या पुलाचा प्रश्न रेंगाळला असला तरीही अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत आहे.लेंडी पुलाचाविकास आराखडा पडला धूळ खात४जिल्हा प्रशासनाने जांभुळबेटच्या विकासासाठी बनविलेल्या विकास आराखड्यामध्ये लेंडी नदीच्या पात्रातील पुलाच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये नियोजित केले आहेत. मात्र मागील एक वर्षापासून हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडलेला आहे. शासनाच्या विभागातील विविध कार्यालय अंदाजपत्रके देत नसल्याने विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे पुलाचा प्रश्नही रेंगाळला असून शासकीय यंत्रणेच्या कचखाऊ कारभाराचा फटका या भागातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलत ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीfloodपूर