शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:56 IST

तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.पालम शहराजवळ अर्धा कि. मी. अंतरावरून लेंडी नदी वाहते. या नदीच्या पात्रात पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर जुनाट आणि अतिशय कमी उंचीचा पूल असल्याने पाऊस पडताच हा रस्ता बंद पडतो. यावर्षी ३० वेळा हा रस्ता बंद पडला आहे. या रस्त्यावर फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, खुरलेवाडी तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेट आहे.पाऊस पडताच पुलावर पाणी येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडत आहे. सलग आठ दिवस हा रस्ता बंद पडून पालम शहराचा संपर्क तुटला होता. याच नदीवर पालम ते पुयणी या रस्त्यावरही शासनाने नवीन पुलाचे बांधकाम केले आहे.अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे नवीन पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी ही पाऊस पडताच पुलावर दोन ते तीन फूट पाणी येऊन रस्ता बंद पडत आहे. या रस्त्यावरील पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर, नाव्हा, खडी या गावांची वाहतूक ठप्प होत आहे. दोन्ही ठिकाणी कमी उंचीचे पूल असून दरवर्षी पावसाळ्यात या १२ गावांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढे होऊनही शासकीय यंत्रणा मात्र नवीन पुलांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात १२ गावांना मोठ्या प्रमाणामध्ये संकटाचा सामना करावा लागत आहे.प्रशासन : गप्पच४यावर्षीच्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे. परिणामी बारा ते तेरा गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.४विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षापासून या पुलाचा प्रश्न रेंगाळला असला तरीही अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत आहे.लेंडी पुलाचाविकास आराखडा पडला धूळ खात४जिल्हा प्रशासनाने जांभुळबेटच्या विकासासाठी बनविलेल्या विकास आराखड्यामध्ये लेंडी नदीच्या पात्रातील पुलाच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये नियोजित केले आहेत. मात्र मागील एक वर्षापासून हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडलेला आहे. शासनाच्या विभागातील विविध कार्यालय अंदाजपत्रके देत नसल्याने विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे पुलाचा प्रश्नही रेंगाळला असून शासकीय यंत्रणेच्या कचखाऊ कारभाराचा फटका या भागातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलत ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीfloodपूर