शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

परभणी : कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:56 IST

तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे.पालम शहराजवळ अर्धा कि. मी. अंतरावरून लेंडी नदी वाहते. या नदीच्या पात्रात पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर जुनाट आणि अतिशय कमी उंचीचा पूल असल्याने पाऊस पडताच हा रस्ता बंद पडतो. यावर्षी ३० वेळा हा रस्ता बंद पडला आहे. या रस्त्यावर फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, खुरलेवाडी तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळ जांभूळबेट आहे.पाऊस पडताच पुलावर पाणी येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडत आहे. सलग आठ दिवस हा रस्ता बंद पडून पालम शहराचा संपर्क तुटला होता. याच नदीवर पालम ते पुयणी या रस्त्यावरही शासनाने नवीन पुलाचे बांधकाम केले आहे.अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे नवीन पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी ही पाऊस पडताच पुलावर दोन ते तीन फूट पाणी येऊन रस्ता बंद पडत आहे. या रस्त्यावरील पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर, नाव्हा, खडी या गावांची वाहतूक ठप्प होत आहे. दोन्ही ठिकाणी कमी उंचीचे पूल असून दरवर्षी पावसाळ्यात या १२ गावांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढे होऊनही शासकीय यंत्रणा मात्र नवीन पुलांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात १२ गावांना मोठ्या प्रमाणामध्ये संकटाचा सामना करावा लागत आहे.प्रशासन : गप्पच४यावर्षीच्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली जात आहे. परिणामी बारा ते तेरा गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.४विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षापासून या पुलाचा प्रश्न रेंगाळला असला तरीही अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत आहे.लेंडी पुलाचाविकास आराखडा पडला धूळ खात४जिल्हा प्रशासनाने जांभुळबेटच्या विकासासाठी बनविलेल्या विकास आराखड्यामध्ये लेंडी नदीच्या पात्रातील पुलाच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये नियोजित केले आहेत. मात्र मागील एक वर्षापासून हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडलेला आहे. शासनाच्या विभागातील विविध कार्यालय अंदाजपत्रके देत नसल्याने विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे पुलाचा प्रश्नही रेंगाळला असून शासकीय यंत्रणेच्या कचखाऊ कारभाराचा फटका या भागातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलत ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीfloodपूर