शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

परभणी ; चारीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:38 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या लघू वितरिकेची अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तर काही शिवारात ही कामे सुरू आहेत. २ डिसेंबर रोजी चारा पिकासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्याची झालेली तुटफूट व लघू वितरिकांच्या अर्धवट कामांंमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे.डुघरा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लघू वितरिका क्रमांक २७ च्या टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने हे पाणी गट क्रमांक ३३ भागातील शेतात घुसले आहे. त्यामुळे शेतात मोठमोठे खड्डे पडले असून पाणी वाहत आहे.डाव्या कालव्याच्या लघू वितरिकेचे काम बंद असल्याने या वितरिकेतून पाणी थेट गावाच्या रस्त्यावरून वाहत आहे. कालव्यात पाणी सोडल्यानंतर नेहमीच अशा प्रकारे शेतकºयांच्या शेतात पाणी घुसते. तसेच डुघरा गावच्या मुख्य रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह कायम राहतो. टंचाईच्या काळात तरी संबंधित विभागाने पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. दरम्यान, यंदा दुष्काळ असल्याने दुधनात असलेले पाणी जपून वापरण्याची गरज आहे;परंतु, संबंधित कार्यालयाच्या कारभारामुळे डुघरा गावच्या रस्त्यावरून पाणी वाहून नासाडी होत आहे.टेलपर्यंत पाणी जाण्यास अडथळे४निम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि .मी.चा आहे. तर उजव्या कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही.४२ डिसेंबर रोजी पाणी कालव्यात सोडल्यानंतर अद्यापही पूर्ण क्षमतेने टेलपर्यंत पोहचले नसल्याची माहिती आहे. कारण अनेक ठिकाणी शेतकरी चाºयाद्वारे पाणी घेत असल्याने कालव्याच्या टेलपर्यंत पाणी संथ गतीने पोहचत आहे. संबंधित विभागाकडून पाणी सोडल्यानंतर टेलपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर वितरिकेद्वारे पाणी देण्याचे नियोजन असते;परंतु, अनेक ठिकाणी चाºया फोडून पाणी घेतले जात असल्याने टेलपर्यंत पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, १२ डिसेंबरपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.प्रत्येक पावसाळ्यात कालव्यात पाणी सोडल्यानंतर डुघरा शिवारातील लघू वितरिकेच्या टेलचे पाणी माझ्या शेतातून वाहते. त्यामुळे शेतातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान होत आहे. सद्य स्थितीत या पाण्यामुळे शेतात नाला बनला आहे. अनेक वेळा संबंधित कार्यालयास याबाबतची माहिती दिली मात्र उपयोग झाला नाही.-गोविंद मगर, शेतकरी, डुघरा

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी