शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:36 IST

येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी प्रकल्पावरून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती़ दहा वर्षापासून ही योजना रखडली असून, सध्या अमृत योजनेतून याच योजनेतील उर्वरित कामे केली जात आहेत़ या अंतर्गत शहरापासून साधारणत: ८ किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे़ तसेच येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरी ते बीपीटी पर्यंतचे कामही पूर्ण झाले असून, येलदरीपासून परभणीपर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे़ येलदरी जलाशयातून धर्मापुरी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचल्यानंतर या योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असल्याने या चाचणीला महत्त्व आले आहे़सध्या ही चाचणी घेण्याचे काम सुरू आहे़ येलदरी जलाशयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या जिंतूर परिसरात ब्रेक पॉर्इंट टर्मिनन बसविण्यात आले आहे़ १ कोटी २५ लाख लिटर क्षमता असलेल्या या बीपीटीपर्यंतची चाचणी पूर्ण झाली असून, पम्पींगच्या सहाय्याने येलदरीतील पाणी बीपीटीपर्यंत पोहचले आहे़ बीपीटीपासून ते धर्मापुरीपर्यंत पाणी घेण्याची चाचणी सध्या सुरू आहे़ मात्र या अंतरात टाकलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी मातीने बंद पडली आहे़ त्यामुळे या जलवाहिनीतील ब्लॉकेज काढण्याचे काम मनपाच्या वतीने केले जात आहे़ जिंतूर शहर, बोरी, झरीमार्गे धर्मापुरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ५ ते ६ महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रत्यक्ष चाचणी घेताना या जलवाहिनीत अनेक ठिकाणी माती अडकून पडल्याचे समोर आले़ त्यामुळे चाचणी घेण्यापूर्वी जलवाहिनीतील ब्लॉकेज मोकळे करावे लागणार असून, हे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत केवळ गुरुत्वार्षणाच्या तत्त्वावरच पाणी येणार आहे़ यासाठी १०० मीटर ग्रॅगीएंट ठेवण्यात आला आहे़ ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कामाला सुरूवात होईल़ येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेऊन चाचणी केली जाणार आहे़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येलदरीचे पाणी जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीपर्यंत पोहोचविण्याचा टप्पाही पूर्ण होईल़ त्यामुळे या चाचणीला महत्त्व आले असून, येत्या एक-दोन दिवसांत चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली़मीटर रुमच्या कामाला सुरुवातयेलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धरणातील पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र मीटर रुमही अमृत योजनेंतर्गत तयार केली जात आहे़ मीटर रुम उभारणीसाठी कंत्राटदारास मार्कआऊट टाकून देण्यात आले आहेत़ यामुळे मीटर रुम उभारणीच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे़ मीटर रुम उभारणीनंतर पम्पींगच्या सहाय्याने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे़ हे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली़जलशुद्धीकरणाचे ८० टक्के कामधर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ या ठिकाणी एरीयशन काम पूर्ण झाले असून, या एरीयशनमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया होणार आहे़ तसेच दोन मोठे टँक उभारण्यात आले असून, या टँकमधून शुद्धीकरणाचे काम होणार आहे़ धर्मापुरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे येलदरी धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर परभणीकरांना पिण्यासाठी मिळण्याची प्रतीक्षाही संपणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी