शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:36 IST

येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी प्रकल्पावरून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती़ दहा वर्षापासून ही योजना रखडली असून, सध्या अमृत योजनेतून याच योजनेतील उर्वरित कामे केली जात आहेत़ या अंतर्गत शहरापासून साधारणत: ८ किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे़ तसेच येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरी ते बीपीटी पर्यंतचे कामही पूर्ण झाले असून, येलदरीपासून परभणीपर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे़ येलदरी जलाशयातून धर्मापुरी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचल्यानंतर या योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असल्याने या चाचणीला महत्त्व आले आहे़सध्या ही चाचणी घेण्याचे काम सुरू आहे़ येलदरी जलाशयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या जिंतूर परिसरात ब्रेक पॉर्इंट टर्मिनन बसविण्यात आले आहे़ १ कोटी २५ लाख लिटर क्षमता असलेल्या या बीपीटीपर्यंतची चाचणी पूर्ण झाली असून, पम्पींगच्या सहाय्याने येलदरीतील पाणी बीपीटीपर्यंत पोहचले आहे़ बीपीटीपासून ते धर्मापुरीपर्यंत पाणी घेण्याची चाचणी सध्या सुरू आहे़ मात्र या अंतरात टाकलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी मातीने बंद पडली आहे़ त्यामुळे या जलवाहिनीतील ब्लॉकेज काढण्याचे काम मनपाच्या वतीने केले जात आहे़ जिंतूर शहर, बोरी, झरीमार्गे धर्मापुरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ५ ते ६ महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रत्यक्ष चाचणी घेताना या जलवाहिनीत अनेक ठिकाणी माती अडकून पडल्याचे समोर आले़ त्यामुळे चाचणी घेण्यापूर्वी जलवाहिनीतील ब्लॉकेज मोकळे करावे लागणार असून, हे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत केवळ गुरुत्वार्षणाच्या तत्त्वावरच पाणी येणार आहे़ यासाठी १०० मीटर ग्रॅगीएंट ठेवण्यात आला आहे़ ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कामाला सुरूवात होईल़ येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेऊन चाचणी केली जाणार आहे़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येलदरीचे पाणी जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीपर्यंत पोहोचविण्याचा टप्पाही पूर्ण होईल़ त्यामुळे या चाचणीला महत्त्व आले असून, येत्या एक-दोन दिवसांत चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली़मीटर रुमच्या कामाला सुरुवातयेलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धरणातील पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र मीटर रुमही अमृत योजनेंतर्गत तयार केली जात आहे़ मीटर रुम उभारणीसाठी कंत्राटदारास मार्कआऊट टाकून देण्यात आले आहेत़ यामुळे मीटर रुम उभारणीच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे़ मीटर रुम उभारणीनंतर पम्पींगच्या सहाय्याने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे़ हे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली़जलशुद्धीकरणाचे ८० टक्के कामधर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ या ठिकाणी एरीयशन काम पूर्ण झाले असून, या एरीयशनमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया होणार आहे़ तसेच दोन मोठे टँक उभारण्यात आले असून, या टँकमधून शुद्धीकरणाचे काम होणार आहे़ धर्मापुरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे येलदरी धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर परभणीकरांना पिण्यासाठी मिळण्याची प्रतीक्षाही संपणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी