शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परभणी : धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:24 IST

तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तालुक्यातील सिरसम शे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत असलेल्या चार वर्गखोल्या व कार्यालयाच्या भिंतीला तडे गेले असून, मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीतील इमातीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. ही इमारत कोसळून विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी १५ डिसेंबर २०१८ रोजी सरपंच ओमकेश केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळेच्या नवीन बांधकामाबाबतचा ठराव पारित करण्यात आला. त्याचबरोबर २३ जानेवारी २०१९ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमान भालेराव व इतर सदस्यांनीही या शाळेला नवीन इमारत देण्याचा ठराव घेतला.२५ जानेवारी २०१९ रोजी गटविकास अधिकारी, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शाळेला भेट देऊन पाहणी केली. यानंतर शाळेची इमारत धोकादायक असल्याची नोंद करून इमारतीची दुुरुस्ती केल्यानंतर ही इमारत वापरणे शक्य नसल्याने इमारत जमीनदोस्त करून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला; परंतु, पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी शिक्षण विभागाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सिरसम ग्रामस्थांतून होत आहे.प्रस्ताव: धूळ खात४१९८८ साली बांधकाम झालेल्या सिरसम शे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ४ खोल्या व एक कार्यालय अशा ५ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या इमारतीला तडे गेल्याने ही इमारत कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते. या शाळेची पाहणी करून ५ फेब्रुवारी २०१९ रोजी संयुक्त तपासणी अहवाल, तपासणी सूची, ग्रा.पं. ठराव, शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव, इमारतीचे फोटो, अंदाजपत्रक आदी कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव जि.प.चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केलेला आहे; परंतु, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही हा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र