शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

परभणी जि़प़ समाजकल्याण विभागातील प्रकार :साडेतीन कोटींचा निधी ठेवला अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:57 IST

मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी सलग तीन वर्षे राखीव ठेवलेला ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अखर्चित ठेवल्याची बाब राज्य शासनाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ त्यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी सलग तीन वर्षे राखीव ठेवलेला ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अखर्चित ठेवल्याची बाब राज्य शासनाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ त्यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे़जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नातील २० टक्के रकमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणाकरीता योजना राबवून त्यावर त्याच वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे़ या संदर्भात राज्य शासनाने १ सप्टेंबर १९९३, १२ डिसेंबर १९९३, २० आॅक्टोबर १९९९ असे तीन वेगवेगळे आदेश काढले आहेत़ त्या आदेशाची अंमलबजावणी करणे सर्व जिल्हा परिषदांना बंधनकारक आहे; परंतु, परभणी जिल्हा परिषदेने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याची बाब लेखापरीक्षणात समोर आली आहे़ २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २० टक्के राखीव निधीतून ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपये प्राप्त झाले़ ही रक्कम त्या-त्या आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे; परंतु, समाजकल्याण विभागाने अंदाजपत्रकात तरतूद करून व अनुदान उपलब्ध असून देखील मागासवर्गीयांच्या कल्याणाकरीता योजना राबविलेल्या दिसून येत नाहीत़ परिणामी ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपयांची रक्कम शिल्लक राहिल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे़ शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने लोकाभिमुखता व संवेदनशीलता राखण्याबाबत प्रयत्न केले नाहीत़ त्यामुळे मागासवर्गीयांना शासनाच्या योजनेचा फायदा मिळू शकला नाही, असेही ताशेरे या अहवालात जिल्हा परिषदेच्या कारभारावर ओढण्यात आले आहेत़ राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या २० आॅक्टोबर १९९९ च्या निर्णयातील सूचना क्रमांक ४ नुसार जिल्हा परिषदांनी मागासवर्गीयांची एकत्रित अशी लाभार्थ्यांची बृहत नोंद वही ठेवणे आवश्यक आहे; परंतु, अशी नोंदवही ठेवण्यात आलेली नसल्याचेही लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला ही बाब गांभिर्याने घेऊन या पुढे अशा चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे़अपंगांच्या योजनांसाठीही : घेतला आखडता हातसमाजकल्याण विभागाने अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता उपलब्ध असलेल्या निधीतून ३ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम २०१५-१६ या आर्थिक वर्षात खर्च केल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे़ या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला असता, २०१४-१५ वर्षाकरीताची तरतूद सदर वर्षात पूर्णपणे खर्च न करता पुढील वर्षात २०१५-१६ मध्ये वापरली गेली़ तर २०१५-१६ या वर्षाची तरतूद सदर वर्षात पूर्णपणे खर्च न करता शिल्लक ठेवून ती २०१६-१७ मध्ये वापरली गेली़ ही अत्यंत आक्षेपार्ह बाब असून, यामुळे विकास योजनांची प्रगती राखली जात नाही, असे लेखापरीक्षकांनी मत नोंदविले आहे़ २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षातील कामनिहाय अनुदान पंचायत समित्यांना ९० टक्के वाटप केले़ उर्वरित १० टक्के रक्कम विभागामध्ये शिल्लक आहे; परंतु, ९ कामे रद्द झालेली व न सुरू झालेली आहेत़ तेव्हा सदर कामांसाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम अद्यापपर्यंत अखर्चित असून, ती शासन खात्यात भरणा केलेली नाही़ त्यामुळे शासनाचे नुकसान झालेले आहे़ तेव्हा याबाबतची १२ लाख ५० हजार रुपये व त्यावर मिळालेल्या व्याजाची रक्कम तात्काळ शासन खाती जमा करावी, असेही लेखापरीक्षकांनी म्हटले आहे़अधिकाºयांचे कर्तव्यपूर्तीकडे दुर्लक्षराज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या २० आॅक्टोबर १९९९ च्या निर्णयातील सूचना क्रमांक ५ नुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेली २० टक्के रक्कम त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी त्याच वित्तीय वर्षात खर्च होते की नाही? हे पाहण्याची जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकाºयांची जबाबदारी आहे; परंतु, ही जबाबदारी संबंधित अधिकाºयांनी चोखपणे पार पाडली नसल्याचे ताशेरे लेखापरीक्षणात ओढण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीParbhani z pपरभणी जिल्हा परिषद