शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जायकवाडी’ भरल्याने वाढल्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:49 IST

जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरु झाली असून हा प्रकल्प ९८ टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्याबरोबरच गोदावरी नदीपात्रातही पाणी सोडले जात आहे. सोमवारी सकाळी जायकवाडी प्रकल्पातून २ हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झाला असून साधारणत: दोन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गोदावरी नदीवर मुद्गल, तारुगव्हाण, ढालेगाव, मुळी आणि डिग्रस हे पाच बंधारे बांधले आहेत. त्यापैकी तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अजून शिल्लक असल्याने या बंधाºयात पाणीसाठा होत नाही. मात्र पाथरी तालुक्यातील मुद्गल आणि ढालेगाव या दोन बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे शक्य आहे. तसेच पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळीतील बंधाºयातही पाणीसाठा करणे शक्य आहे. दीड महिन्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उर्ध्वभागातील प्रकल्प १०० टक्के भरल्याने जायकवाडीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरणे अपेक्षित असताना केवळ पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणा एवढेच पाणी बंधाºयामध्ये साठविण्यात आले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी सिंचनाचा प्रश्न कायम आहे.१५ सप्टेंबर रोजी जायकवाडी प्रकल्प पुन्हा एकदा ९८ टक्के भरला असून या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आता या पाण्याचे राजकारण न करता जिल्ह्यातील चारही बंधारे पाण्याने भरुन घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाण्याची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरु शकतात. बंधाऱ्यांमध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठा झाला तर बंधारा परिसरातील शेकडो गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यामुळे जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याने १०० टक्के भरुन घ्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.बंधाºयांमध्ये : २५ टक्केच पाणीसाठा४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयावर पाथरी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. १६ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सद्यस्थितीला बंधाºयात केवळ ३.१५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.४याच तालुक्यातील मुद्गल बंधाºयातून सोनपेठ शहराला पाणी दिले जाते. त्यासाठी २.८५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. १४ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सध्या बंधाºयात ३.२५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.४तर पालम तालुक्यातील डिग्रस हा जिल्ह्यात सर्वात मोठा ६४ दलघमी क्षमतेचा बंधारा आहे. मात्र या बंधाºयात केवळ १२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मागील वेळेस बंधारे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरुन घेणे आवश्यक होते.४ त्यावेळी केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा करण्यात आला. आता यावेळी दुसºयांदा नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने हे बंधारे १०० टक्के भरुन घेतले तर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प