शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

परभणी : आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:19 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक वर्षापासून येलदरी व जायकवाडी सारखी मोठी धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्ह्यातील ८६ जलसाठ्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३.६५ मीटरने पाणीपातळी वाढल्याची भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे नोंद आहे. पाणीपातळी वाढल्याने विहीर व बोअरला पाणीही मुबलक उपलब्ध आहे.त्यामुुळे या पाण्यावर भाजीपाल्याची पिके घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. काही दिवसांमध्येच ही पिके हातात येत असल्याने व त्यांना यापूर्वी चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांचीही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. परभणी येथील शनिवारच्या बाजारात या पालेभाज्यांच्या दरांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव होऊ लागली आहे.काही दिवसांपूर्वीच शंभर रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो रूपये दराने विकला जाणारा कांदा शनिवार बाजारात २० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. बटाटेही २० रुपये किलोनेच तर टोमॅटो ७ रुपये प्रतिकिलोने, कोथिंबीर फक्त १५ रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. आद्रक ५० रुपये प्रतिकिलो तर वांगे २० रुपये , भेंडी ३० रुपये, फूलकोबी व पत्ताकोबी प्रतिकिलो १५ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, काकडी १२ रुपये, लिंबू ३० रुपये, गाजर १५ रुपये, वालाच्या शेंगा २० रुपये, मेथी ५ रुपये प्रति जुडी, पालक १५ रुपये जुडी, कांदापात २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विकली जात होती. मुळा १० रुपयास एक, शेवगा, गवार प्रतिकिलो ६० रुपये तर चवळीची शेंग ४० रुपये प्रतिकिलोे, कारले ४० रुपये प्रतिकिलो, कद्दू प्रति नग १० रुपये या दराने विक्री केला जात असल्याचे पहावयास मिळाले. एकीकडे पालेभाज्यांचे भाव कोसळले असताना खरेदीदारांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातून थेट बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर निराशेची भावना दिसून येत होती.यावर्षी पहिल्यांदाच चांगले पाणी उपलब्ध झाल्याने मोठ्या अपेक्षेने शेतात पालेभाज्यांची लागवड केली होती. यासाठी मेहनतही अधिक घेतली होती. आता बाजारात माल विक्रीला आणल्यानंतर भाव मिळत नाही. त्यामुळे या मालाच्या विक्रीतून मिळणाºया पैशावर संसाराचे केलेले नियोजन फिसकटले आहे. त्यामुळे आमच्यावर नेहमीप्रमाणे संकटाची छाया गडद झाली आहे.-संतोष इक्कर,भाजीपाला विक्रेता

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्याRainपाऊस