शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

परभणी : आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:19 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक वर्षापासून येलदरी व जायकवाडी सारखी मोठी धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्ह्यातील ८६ जलसाठ्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३.६५ मीटरने पाणीपातळी वाढल्याची भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे नोंद आहे. पाणीपातळी वाढल्याने विहीर व बोअरला पाणीही मुबलक उपलब्ध आहे.त्यामुुळे या पाण्यावर भाजीपाल्याची पिके घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. काही दिवसांमध्येच ही पिके हातात येत असल्याने व त्यांना यापूर्वी चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांचीही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. परभणी येथील शनिवारच्या बाजारात या पालेभाज्यांच्या दरांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव होऊ लागली आहे.काही दिवसांपूर्वीच शंभर रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो रूपये दराने विकला जाणारा कांदा शनिवार बाजारात २० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. बटाटेही २० रुपये किलोनेच तर टोमॅटो ७ रुपये प्रतिकिलोने, कोथिंबीर फक्त १५ रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. आद्रक ५० रुपये प्रतिकिलो तर वांगे २० रुपये , भेंडी ३० रुपये, फूलकोबी व पत्ताकोबी प्रतिकिलो १५ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, काकडी १२ रुपये, लिंबू ३० रुपये, गाजर १५ रुपये, वालाच्या शेंगा २० रुपये, मेथी ५ रुपये प्रति जुडी, पालक १५ रुपये जुडी, कांदापात २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विकली जात होती. मुळा १० रुपयास एक, शेवगा, गवार प्रतिकिलो ६० रुपये तर चवळीची शेंग ४० रुपये प्रतिकिलोे, कारले ४० रुपये प्रतिकिलो, कद्दू प्रति नग १० रुपये या दराने विक्री केला जात असल्याचे पहावयास मिळाले. एकीकडे पालेभाज्यांचे भाव कोसळले असताना खरेदीदारांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातून थेट बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर निराशेची भावना दिसून येत होती.यावर्षी पहिल्यांदाच चांगले पाणी उपलब्ध झाल्याने मोठ्या अपेक्षेने शेतात पालेभाज्यांची लागवड केली होती. यासाठी मेहनतही अधिक घेतली होती. आता बाजारात माल विक्रीला आणल्यानंतर भाव मिळत नाही. त्यामुळे या मालाच्या विक्रीतून मिळणाºया पैशावर संसाराचे केलेले नियोजन फिसकटले आहे. त्यामुळे आमच्यावर नेहमीप्रमाणे संकटाची छाया गडद झाली आहे.-संतोष इक्कर,भाजीपाला विक्रेता

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्याRainपाऊस