शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी : रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची झाली गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:53 IST

दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर सर्वच रेल्वेगाड्यांना गर्दी आहे. असे असताना मध्यरेल्वे विभागाने २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत मनमाड ते दौंड दरम्यान मोठा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे नांदेड विभागातून धावणाºया काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे - निजामाबाद पॅसेंजर २० ते २७ नोव्हेंबर रोजी, निजामाबाद - पंढरपूर २१ नोव्हेंबर तर निजामाबाद-पुणे २२ व २६ नोव्हेंबर रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. दिवाळीच्या सुट्या सुरु असताना ऐनवेळी मुगट- मुदखेड दरम्यान रेल्वे ब्लॉक घेतल्याने त्यावेळी गाड्या उशिराने धावल्या होत्या. तर आता दिवाळी सुट्ट्या संपत असताना गाड्या रद्द करण्याच्या या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे विभागाच्या या कारभाराचा प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे