शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:17 AM

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच रेशनचे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जून २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे़ जून महिन्यापासून आतापर्यंत २ लाख ६७ हजार ४१३ शिधापत्रिका धारकांची आधार नोंदणी झाली असून, या शिधापत्रिका धारकांना ई-पॉसच्या सहाय्याने धान्य वाटप सुरू आहे़ मार्च २०१८ पासून जिल्ह्यामध्ये एईपीडीएस ही प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाबरोबरच लाभार्थ्याचा अंगठा ई-पॉस मशीनवर जुळवणी झाल्याशिवाय धान्य वितरण करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे ७४ हजार लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात़नोव्हेंबर महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यासाठी नव्याने आधार सिडींग केलेला डाटा वापरला जाणार आहे़ हे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांचे आधार नोंदविले नसतील, अशा सदस्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा ठेवून आधार क्रमांक नोंदविल्यास त्या सदस्याची आधार सिडींग होणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़...तर रद्द होणार शिधापत्रिका४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत कुटूंबातील एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक नोंद झालेला नसेल तर ती शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे़ त्यामुळे ज्या कुटूंबातील एकाही सदस्याचे आधार क्रमांक नोंदविलेले नाहीत, त्यांनी ३० आॅक्टोबरपूर्वी तहसील कार्यालयात जाऊन सर्व सदस्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका रद्द कराव्या लागतील़ नवीन शिधापत्रिकेसाठी पुन्हा तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल़ ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी तत्काळ आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAdhar Cardआधार कार्ड