शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परभणी: जिंतूर तालुक्यातील ५० गावांत अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:03 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.जिंतूर तालुक्यातील भूसकवाडी, सांगळेवाडी, आघाववाडी, नांदगाव, दुधगाव, करवली, मानकेश्वर, निवळी खुर्द, जांब बु., निवळी, सायखेडा, गणपूर, कौसडी, नागठाणा, मालेगाव, दहेगाव, कोठा तांडा, दगडचोप, धमधम, उमरद, धानोरा घागरा, मांडवा, कोलपा, कुºहाडी, येणाली तांडा, आडगाव तांडा दगडवाडी, डोंगरतळा, चितनरवाडी, करवली, मोहाडी, रुपनारवाडी, जांब बु., रायखेडा, निवळी खुर्द, मालेगाव तांडा, गोंधळा, कोसडी, मालेगाव, बोरगळवाडी, वाघी धानोरा, कोठा, कोठातांडा, पिंपळगाव तांडा, घेवडा, विजय नगर, केहाळ अशा ५० गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा आढळून आला आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत हातपंप, सार्वजनिक नळ योजना या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक असताना अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर टाकत नाहीत. परिणामी या ५० गावांतील २५ हजार ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद या यंत्रणेचे दुर्लक्ष दिसत आहे. विशेष म्हणजे या ५० गावांपैकी २५ गावांमध्ये हातपंप आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी व सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित असल्याने ग्रामीण आरोग्याशी चालणारा हा खेळ पंचायत समिती प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा नसताना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. लहान बालके महिला यांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही गंभीर बाब गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील दिसत नसल्याने आरोग्याबाबतची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.ब्लिचिंग: पावडरचा होईना वापर४जिंतूर तालुक्यात १३५ ग्रामपंचायती आहेत. तर १७० गावांमध्ये या ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे सर्व कारभार ग्रामपंचायतीच्या सेवकाकडे व सरपंचाकडे असतो. ग्रामपंचायती लाखो रुपये ब्लिचिंग पावडरवर खर्च करतात. मात्र हे ब्लिचिंग पावडर जाते कुठे? हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, नळ योजनेच्या पाण्यात पावडर टाकले जात नाही. परिणामी दूषित पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यास ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा जबाबदार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.नळ योजनेचे पाणी दूषिततालुक्यातील करवली, आघाववाडी, गणपूर, येनोली तांडा, गोंधळा या गावांमध्ये सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित आहे. हे पाणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरित असताना पंचायत समितीला मात्र याचे गांभीर्य नाही. त्याच बरोबर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे हातपंप दूषित आहेत. यामध्ये निवळी खुर्द, कोठा तांडा, बोरगळवाडी, वाघीधानोरा या गावांच्या शाळेतील हातपंप दूषित असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी