शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

परभणी: जिंतूर तालुक्यातील ५० गावांत अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:03 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.जिंतूर तालुक्यातील भूसकवाडी, सांगळेवाडी, आघाववाडी, नांदगाव, दुधगाव, करवली, मानकेश्वर, निवळी खुर्द, जांब बु., निवळी, सायखेडा, गणपूर, कौसडी, नागठाणा, मालेगाव, दहेगाव, कोठा तांडा, दगडचोप, धमधम, उमरद, धानोरा घागरा, मांडवा, कोलपा, कुºहाडी, येणाली तांडा, आडगाव तांडा दगडवाडी, डोंगरतळा, चितनरवाडी, करवली, मोहाडी, रुपनारवाडी, जांब बु., रायखेडा, निवळी खुर्द, मालेगाव तांडा, गोंधळा, कोसडी, मालेगाव, बोरगळवाडी, वाघी धानोरा, कोठा, कोठातांडा, पिंपळगाव तांडा, घेवडा, विजय नगर, केहाळ अशा ५० गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा आढळून आला आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत हातपंप, सार्वजनिक नळ योजना या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक असताना अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर टाकत नाहीत. परिणामी या ५० गावांतील २५ हजार ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद या यंत्रणेचे दुर्लक्ष दिसत आहे. विशेष म्हणजे या ५० गावांपैकी २५ गावांमध्ये हातपंप आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी व सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित असल्याने ग्रामीण आरोग्याशी चालणारा हा खेळ पंचायत समिती प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा नसताना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. लहान बालके महिला यांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही गंभीर बाब गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील दिसत नसल्याने आरोग्याबाबतची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.ब्लिचिंग: पावडरचा होईना वापर४जिंतूर तालुक्यात १३५ ग्रामपंचायती आहेत. तर १७० गावांमध्ये या ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे सर्व कारभार ग्रामपंचायतीच्या सेवकाकडे व सरपंचाकडे असतो. ग्रामपंचायती लाखो रुपये ब्लिचिंग पावडरवर खर्च करतात. मात्र हे ब्लिचिंग पावडर जाते कुठे? हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, नळ योजनेच्या पाण्यात पावडर टाकले जात नाही. परिणामी दूषित पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यास ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा जबाबदार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.नळ योजनेचे पाणी दूषिततालुक्यातील करवली, आघाववाडी, गणपूर, येनोली तांडा, गोंधळा या गावांमध्ये सार्वजनिक नळ योजनेचे पाणी दूषित आहे. हे पाणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरित असताना पंचायत समितीला मात्र याचे गांभीर्य नाही. त्याच बरोबर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे हातपंप दूषित आहेत. यामध्ये निवळी खुर्द, कोठा तांडा, बोरगळवाडी, वाघीधानोरा या गावांच्या शाळेतील हातपंप दूषित असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी