शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

परभणी : सहा लाख शेतकऱ्यांना विमा मिळण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:46 IST

२०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.२०१८-१९ या खरीप हंगामात जवळपास साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, मूग, उडीद व कापसाची लागवड करण्यात आली होती. जून व जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिके चांगली बहरली होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊसच झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने शेतकºयांनी पेरणी व लागवड केलेल्या पिकाची अवस्था बिकट बनली. पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. २०१८-१९ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत इफको टोकियो विमा कंपनीकडे २५७ कोटी ७३ लाख २२ हजार ८८२ रुपयांचा पीक विमा भरला होता. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा महसूल प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या पीक पाहणीतून खरीप हंगामातील उत्पादनात ७५ टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या अधिसूचित पीक विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यापर्यंत विमा नुकसान भरपाई आगाऊ रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे नुकतेच इफको टोकिया विमा कंपनीला आदेशित केले आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव, जांब, झरी, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी व परभणी या मंडळांचा समावेश आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, राणीसावरगाव, माखणी व गंगाखेड, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव व सोनपेठ, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी व पालम, पाथरीमधील बाभळगाव, हादगाव व पाथरी, मानवतमधील कोल्हा, केकरजवळा, मानवत, जिंतूरमधील सावंगी, बामणी, चारठाणा, आडगाव, बोरी व जिंतूर, पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, ताडकळस व पूर्णा तर सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु., कुपटा, वालूर, देऊळगाव गात व सेलू मंडळातील तूर उत्पादकांना २५ टक्यापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे या खरीप हंगामातील जवळपास ६ लाख शेतकºयांना पीक विम्याची रक्कम अपेक्षा आहे.गतवर्षीच्या विम्यासाठी केवळ आश्वासने२०१७-१८ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी ४ लाख २४ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा ३१ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांचा पीक विमा उतरविला होता. त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने महसूल व गाव मंडळाला फाटा देत तालुका घटक गृहीत धरून ४ लाख शेतकºयांना १४७ कोटी रुपयांची रक्कम दिली. त्यामुळे जवळपास ४ लाख शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले. वंचित शेतकºयांना रक्कम देण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय पक्ष, संघटना व वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री व महसूल मंत्र्यांना भेटून न्याय देण्याची मागणी केली; परंतु, २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाही गतवर्षीच्या विम्याच्या रकमेसाठी मात्र केवळ आश्वासनेच मिळत असल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा