शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

परभणी : सहा लाख शेतकऱ्यांना विमा मिळण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:46 IST

२०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१८-१९ या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या पिकासाठी विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई अगाऊ अदा करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांना पीक विम्या मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.२०१८-१९ या खरीप हंगामात जवळपास साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, मूग, उडीद व कापसाची लागवड करण्यात आली होती. जून व जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिके चांगली बहरली होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊसच झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने शेतकºयांनी पेरणी व लागवड केलेल्या पिकाची अवस्था बिकट बनली. पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. २०१८-१९ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत इफको टोकियो विमा कंपनीकडे २५७ कोटी ७३ लाख २२ हजार ८८२ रुपयांचा पीक विमा भरला होता. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा महसूल प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या पीक पाहणीतून खरीप हंगामातील उत्पादनात ७५ टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तूर या अधिसूचित पीक विमाधारक शेतकºयास २५ टक्क्यापर्यंत विमा नुकसान भरपाई आगाऊ रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे नुकतेच इफको टोकिया विमा कंपनीला आदेशित केले आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव, जांब, झरी, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी व परभणी या मंडळांचा समावेश आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, राणीसावरगाव, माखणी व गंगाखेड, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव व सोनपेठ, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी व पालम, पाथरीमधील बाभळगाव, हादगाव व पाथरी, मानवतमधील कोल्हा, केकरजवळा, मानवत, जिंतूरमधील सावंगी, बामणी, चारठाणा, आडगाव, बोरी व जिंतूर, पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, ताडकळस व पूर्णा तर सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु., कुपटा, वालूर, देऊळगाव गात व सेलू मंडळातील तूर उत्पादकांना २५ टक्यापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे या खरीप हंगामातील जवळपास ६ लाख शेतकºयांना पीक विम्याची रक्कम अपेक्षा आहे.गतवर्षीच्या विम्यासाठी केवळ आश्वासने२०१७-१८ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी ४ लाख २४ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा ३१ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांचा पीक विमा उतरविला होता. त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने महसूल व गाव मंडळाला फाटा देत तालुका घटक गृहीत धरून ४ लाख शेतकºयांना १४७ कोटी रुपयांची रक्कम दिली. त्यामुळे जवळपास ४ लाख शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले. वंचित शेतकºयांना रक्कम देण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय पक्ष, संघटना व वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री व महसूल मंत्र्यांना भेटून न्याय देण्याची मागणी केली; परंतु, २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाही गतवर्षीच्या विम्याच्या रकमेसाठी मात्र केवळ आश्वासनेच मिळत असल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा