शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परभणीकरांची बातच न्यारी: ज्याने शिवसेना सोडली त्याला जनतेने सोडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 08:32 IST

Shiv sena: शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे.

- अभिमन्यू कांबळे परभणी : शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांना नंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

अन् शिवसेनेला राज्यस्तरावर मान्यता १९८९ मध्ये शिवसेनेला पक्षाची मान्यता नसताना सेनेचे अशोकराव देशमुख हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा परभणी लोकसभेतून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेला राज्यस्तरावर पक्षाची मान्यता मिळाली. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव देशमुख हे शिवसेनेकडून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून आले. १९९६ मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या वर्षीच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश जाधव यांनी पराभव केला.    

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत १८ महिने चाललेल्या सरकारच्या वेळी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले. हा शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीचा एकमेव अपवाद. त्यावेळी शिवसेनेचे सुरेश जाधव पराभूत झाले. १९९९ मध्ये पुन्हा सेनेकडून जाधव निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांचा पराभव केला. नंतरच्या कालावधीत जाधव यांनी शिवसेना सोडली. 

२००४ च्या निवडणुकीत ॲड. तुकाराम रेंगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला. नंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून परभणी विधानसभा लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तत्पूर्वी १९९५ व १९९९ असे दोन वेळा ॲड. रेंगे पाटील शिवसेनेच्या तिकिटावर परभणी विधानसभेतून निवडून आले होते.  

तसेच १९९० मध्ये हनुमंतराव बोबडे परभणी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. नंतर त्यांनी शिवसेना सोडली. ते पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाparbhani-pcपरभणी