शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांची बातच न्यारी: ज्याने शिवसेना सोडली त्याला जनतेने सोडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 08:32 IST

Shiv sena: शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे.

- अभिमन्यू कांबळे परभणी : शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांना नंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

अन् शिवसेनेला राज्यस्तरावर मान्यता १९८९ मध्ये शिवसेनेला पक्षाची मान्यता नसताना सेनेचे अशोकराव देशमुख हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा परभणी लोकसभेतून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेला राज्यस्तरावर पक्षाची मान्यता मिळाली. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव देशमुख हे शिवसेनेकडून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून आले. १९९६ मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या वर्षीच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश जाधव यांनी पराभव केला.    

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत १८ महिने चाललेल्या सरकारच्या वेळी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले. हा शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीचा एकमेव अपवाद. त्यावेळी शिवसेनेचे सुरेश जाधव पराभूत झाले. १९९९ मध्ये पुन्हा सेनेकडून जाधव निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांचा पराभव केला. नंतरच्या कालावधीत जाधव यांनी शिवसेना सोडली. 

२००४ च्या निवडणुकीत ॲड. तुकाराम रेंगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला. नंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून परभणी विधानसभा लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तत्पूर्वी १९९५ व १९९९ असे दोन वेळा ॲड. रेंगे पाटील शिवसेनेच्या तिकिटावर परभणी विधानसभेतून निवडून आले होते.  

तसेच १९९० मध्ये हनुमंतराव बोबडे परभणी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. नंतर त्यांनी शिवसेना सोडली. ते पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाparbhani-pcपरभणी