शहरं
Join us  
Trending Stories
1
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
2
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
3
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
4
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
5
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
6
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
7
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
9
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
10
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
11
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
12
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
13
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
14
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
15
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
16
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
17
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
18
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
19
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
20
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गोदावरीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:34 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा होता; परंतु, डिसेंबर महिन्यातच नांदेडसाठी पाणी सोडण्यात आल्याने बंधाºयात केवळ ५ दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता़ गोदावरी नदी पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरले आहेत़ यामुळे पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे़ दिवसेंदिवस खड्ड्यातील पाणी आटत आहे़ याचा फटका गोदाकाठच्या शेतकऱ्यांना बसत असून, बागायती पिके वाळून जात आहेत़ पाणी साठे संपत आल्याने जागोजाग पात्र कोरडे पडले आहे़ सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजुर, सांवगी भु या गावांच्या शेजारी गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, वजुर, देवठाणा या गावांतही पात्रातून प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे़ मात्र गोदावरीचे पात्र कोरडे पडल्याने १२ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे़ बंधाºयातील पाणी लवकर सोडल्याने पूर्ण, पालम तालुक्यातील गावांवर टंचाईचे संकट ओढावले आहे़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका या गावांना बसण्यास सुरू झाली आहे़ऊस पीक : मोडण्याची आली वेळगोदाकाठच्या गावात दोन्ही बाजूनी दिग्रस बंधारा असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली होती़; परंतु, पाणी नांदेडसाठी सोडल्याने पात्रात साठा शिल्लक राहिलेला नाही़ याचा सर्वाधिक फटका बागायती पिकांना बसणार आहे़ हजारो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, उसाच्या पिकावर नागर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाल्या अडचणीगोदावरी पात्रात गावांना पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ पात्रात पाणी असेल तर योजनेच्या विहिरींना भरपूर पाणी राहते़ पण यावर्षी पाणी सोडून देण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, हा प्रश्न ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाला आहे

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीdroughtदुष्काळ