शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गोदावरीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:34 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा होता; परंतु, डिसेंबर महिन्यातच नांदेडसाठी पाणी सोडण्यात आल्याने बंधाºयात केवळ ५ दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता़ गोदावरी नदी पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरले आहेत़ यामुळे पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे़ दिवसेंदिवस खड्ड्यातील पाणी आटत आहे़ याचा फटका गोदाकाठच्या शेतकऱ्यांना बसत असून, बागायती पिके वाळून जात आहेत़ पाणी साठे संपत आल्याने जागोजाग पात्र कोरडे पडले आहे़ सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजुर, सांवगी भु या गावांच्या शेजारी गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, वजुर, देवठाणा या गावांतही पात्रातून प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे़ मात्र गोदावरीचे पात्र कोरडे पडल्याने १२ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे़ बंधाºयातील पाणी लवकर सोडल्याने पूर्ण, पालम तालुक्यातील गावांवर टंचाईचे संकट ओढावले आहे़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका या गावांना बसण्यास सुरू झाली आहे़ऊस पीक : मोडण्याची आली वेळगोदाकाठच्या गावात दोन्ही बाजूनी दिग्रस बंधारा असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली होती़; परंतु, पाणी नांदेडसाठी सोडल्याने पात्रात साठा शिल्लक राहिलेला नाही़ याचा सर्वाधिक फटका बागायती पिकांना बसणार आहे़ हजारो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, उसाच्या पिकावर नागर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाल्या अडचणीगोदावरी पात्रात गावांना पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ पात्रात पाणी असेल तर योजनेच्या विहिरींना भरपूर पाणी राहते़ पण यावर्षी पाणी सोडून देण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, हा प्रश्न ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाला आहे

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीdroughtदुष्काळ