शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

परभणी: गोदावरीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:34 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा होता; परंतु, डिसेंबर महिन्यातच नांदेडसाठी पाणी सोडण्यात आल्याने बंधाºयात केवळ ५ दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता़ गोदावरी नदी पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरले आहेत़ यामुळे पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे़ दिवसेंदिवस खड्ड्यातील पाणी आटत आहे़ याचा फटका गोदाकाठच्या शेतकऱ्यांना बसत असून, बागायती पिके वाळून जात आहेत़ पाणी साठे संपत आल्याने जागोजाग पात्र कोरडे पडले आहे़ सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजुर, सांवगी भु या गावांच्या शेजारी गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, वजुर, देवठाणा या गावांतही पात्रातून प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे़ मात्र गोदावरीचे पात्र कोरडे पडल्याने १२ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे़ बंधाºयातील पाणी लवकर सोडल्याने पूर्ण, पालम तालुक्यातील गावांवर टंचाईचे संकट ओढावले आहे़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका या गावांना बसण्यास सुरू झाली आहे़ऊस पीक : मोडण्याची आली वेळगोदाकाठच्या गावात दोन्ही बाजूनी दिग्रस बंधारा असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली होती़; परंतु, पाणी नांदेडसाठी सोडल्याने पात्रात साठा शिल्लक राहिलेला नाही़ याचा सर्वाधिक फटका बागायती पिकांना बसणार आहे़ हजारो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, उसाच्या पिकावर नागर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाल्या अडचणीगोदावरी पात्रात गावांना पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ पात्रात पाणी असेल तर योजनेच्या विहिरींना भरपूर पाणी राहते़ पण यावर्षी पाणी सोडून देण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, हा प्रश्न ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाला आहे

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीdroughtदुष्काळ