शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:51 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच शेतकºयांसाठी टांगती तलवार बनला आहे. नांदेडसाठी कधी पाणी नेले जाईल, याचा नेम राहिला नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाणी पळविले जाते. मात्र यावर्षी प्रशासकीय यंत्रणेच्या वरदहस्ताने डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आले आहे. या पाणीसाठ्याच्या विश्वासावर गोदाकाठच्या शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करुन ऊस लागवड केली आहे. हा भाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जावू लागला. मात्र अचानक २२ डिसेंबर रोजी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडला सोडण्यात आल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या उसाला पुढील काळात पाणी उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शेतातील ऊस, कारखान्यांना देऊन या पिकावर नांगर फिरविण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे. पाणी नसल्याने ऊस मोडल्यामुळे लागवडीमध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, जवळा, गुळखंड, फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी ही तेरा गावे तर पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, मुंबरे, महागाव, कळगाव, गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आदी २१ गावांतील शिवारात उभ्या असलेल्या उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय व प्रशासकीय धोरणाचा शेतकºयांना दगाफटका बसला आहे.उत्पादकांना मदतीची गरज४उसाच्या पिकासाठी शेतकºयांनी मशागत, उसाचे बेणे, रासायनिक खत, मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. हे पीक दोन वर्षे उत्पादन देते म्हणून शेतकºयांनी मागील वर्षी लागवड केलेल्या उसातून उत्पादन खर्चही निघने कठीण बनले आहे. पाण्याअभावी ऊस मोडावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.शेतकरी हवालदिल४बंधाºयातील पाणीसाठ्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती; परंतु, डिग्रस बंधाºयातून अचानक पाणी सोडल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. अगोदरच खरीप व रबी हंगामातील पिकांनी धोका दिला आहे. उसाचे पीक चार पैसे मिळवून देईल, ही आशा होती. मात्र पाणी सोडल्याने यावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी