शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:51 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच शेतकºयांसाठी टांगती तलवार बनला आहे. नांदेडसाठी कधी पाणी नेले जाईल, याचा नेम राहिला नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाणी पळविले जाते. मात्र यावर्षी प्रशासकीय यंत्रणेच्या वरदहस्ताने डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आले आहे. या पाणीसाठ्याच्या विश्वासावर गोदाकाठच्या शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करुन ऊस लागवड केली आहे. हा भाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जावू लागला. मात्र अचानक २२ डिसेंबर रोजी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडला सोडण्यात आल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या उसाला पुढील काळात पाणी उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शेतातील ऊस, कारखान्यांना देऊन या पिकावर नांगर फिरविण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे. पाणी नसल्याने ऊस मोडल्यामुळे लागवडीमध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, जवळा, गुळखंड, फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी ही तेरा गावे तर पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, मुंबरे, महागाव, कळगाव, गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आदी २१ गावांतील शिवारात उभ्या असलेल्या उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय व प्रशासकीय धोरणाचा शेतकºयांना दगाफटका बसला आहे.उत्पादकांना मदतीची गरज४उसाच्या पिकासाठी शेतकºयांनी मशागत, उसाचे बेणे, रासायनिक खत, मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. हे पीक दोन वर्षे उत्पादन देते म्हणून शेतकºयांनी मागील वर्षी लागवड केलेल्या उसातून उत्पादन खर्चही निघने कठीण बनले आहे. पाण्याअभावी ऊस मोडावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.शेतकरी हवालदिल४बंधाºयातील पाणीसाठ्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती; परंतु, डिग्रस बंधाºयातून अचानक पाणी सोडल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. अगोदरच खरीप व रबी हंगामातील पिकांनी धोका दिला आहे. उसाचे पीक चार पैसे मिळवून देईल, ही आशा होती. मात्र पाणी सोडल्याने यावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी