शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:51 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच शेतकºयांसाठी टांगती तलवार बनला आहे. नांदेडसाठी कधी पाणी नेले जाईल, याचा नेम राहिला नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाणी पळविले जाते. मात्र यावर्षी प्रशासकीय यंत्रणेच्या वरदहस्ताने डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आले आहे. या पाणीसाठ्याच्या विश्वासावर गोदाकाठच्या शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करुन ऊस लागवड केली आहे. हा भाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जावू लागला. मात्र अचानक २२ डिसेंबर रोजी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडला सोडण्यात आल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या उसाला पुढील काळात पाणी उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शेतातील ऊस, कारखान्यांना देऊन या पिकावर नांगर फिरविण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे. पाणी नसल्याने ऊस मोडल्यामुळे लागवडीमध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, जवळा, गुळखंड, फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी ही तेरा गावे तर पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, मुंबरे, महागाव, कळगाव, गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आदी २१ गावांतील शिवारात उभ्या असलेल्या उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय व प्रशासकीय धोरणाचा शेतकºयांना दगाफटका बसला आहे.उत्पादकांना मदतीची गरज४उसाच्या पिकासाठी शेतकºयांनी मशागत, उसाचे बेणे, रासायनिक खत, मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. हे पीक दोन वर्षे उत्पादन देते म्हणून शेतकºयांनी मागील वर्षी लागवड केलेल्या उसातून उत्पादन खर्चही निघने कठीण बनले आहे. पाण्याअभावी ऊस मोडावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.शेतकरी हवालदिल४बंधाºयातील पाणीसाठ्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती; परंतु, डिग्रस बंधाºयातून अचानक पाणी सोडल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. अगोदरच खरीप व रबी हंगामातील पिकांनी धोका दिला आहे. उसाचे पीक चार पैसे मिळवून देईल, ही आशा होती. मात्र पाणी सोडल्याने यावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी