शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:25 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अर्धा पावसाळा सरला तरी एकाही नदीला पूर आला नाही. कुठेही पूर परिस्थिती नसली तरी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात दररोज पाण्याची आवक सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी जायकवाडी प्रकल्पामध्ये ६३ हजार ६६ क्युसेस पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पामध्ये २५२९.४८६ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून ८२.५१ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पुढे सोडण्याची शक्यता आहे.धरणातून केव्हाही गोदावरी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते. हे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यानंतर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तसेच या काळात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर दवंडी देऊन पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवकांना गावात थांबण्याचे सूचित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर एकूण काठावरील गावांपैकी साधारणत: ११८ गावांना पुराची शक्यता निर्माण होते. केव्हा तरी पूर येणाऱ्या गावांची नोंद निळ्या रेषेखालील गावे म्हणून केली जाते, अशी २७ गावे आहेत. तर अधिक वेळा पूर येणाºया गावांची संख्या ९१ एवढी आहे.डाव्या कालव्यातून २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यामध्ये पोहचणार आहे. जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.४त्या पार्श्वभूमीवर ११ आॅगस्टपासून २०० क्युसेस पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर अनेक भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी पाथरी, मानवत तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा पूर्णत: कोरडा असून मानवत तालुक्यातील ०.०१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या दोन तालुक्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णीक विद्युत केंद्रालाही पाणी दिले जाईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सलगरकर यांनी दिली.बचाव साहित्य आणि पथके सज्ज४पूर परिस्थिती निर्माण झालीच तर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी त्या त्या गावातील बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तहसील कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले जीवनरक्षक जॅकेट, कटर, दोरी, बोट आदी साहित्यही सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करुन घेतली जात आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली.गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असल्याने सर्व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना नदीकाठावरील गावांना पूर्व सूचना द्याव्यात. तसेच सतर्क रहावे, अशा सूचना दिल्या आहेत.-अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारीपूर्णा तालुक्यात १२ गावे४पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीकाठावर एकूण १२ गावे असून जायकवाडी धरणातील पाणी या गाव परिसरात कधीही पोहचू शकते. त्यामुळे या गावांमध्येही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार शाम मदनूरकर यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी