शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:25 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अर्धा पावसाळा सरला तरी एकाही नदीला पूर आला नाही. कुठेही पूर परिस्थिती नसली तरी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात दररोज पाण्याची आवक सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी जायकवाडी प्रकल्पामध्ये ६३ हजार ६६ क्युसेस पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पामध्ये २५२९.४८६ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून ८२.५१ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पुढे सोडण्याची शक्यता आहे.धरणातून केव्हाही गोदावरी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते. हे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यानंतर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तसेच या काळात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर दवंडी देऊन पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवकांना गावात थांबण्याचे सूचित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर एकूण काठावरील गावांपैकी साधारणत: ११८ गावांना पुराची शक्यता निर्माण होते. केव्हा तरी पूर येणाऱ्या गावांची नोंद निळ्या रेषेखालील गावे म्हणून केली जाते, अशी २७ गावे आहेत. तर अधिक वेळा पूर येणाºया गावांची संख्या ९१ एवढी आहे.डाव्या कालव्यातून २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यामध्ये पोहचणार आहे. जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.४त्या पार्श्वभूमीवर ११ आॅगस्टपासून २०० क्युसेस पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर अनेक भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी पाथरी, मानवत तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा पूर्णत: कोरडा असून मानवत तालुक्यातील ०.०१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या दोन तालुक्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णीक विद्युत केंद्रालाही पाणी दिले जाईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सलगरकर यांनी दिली.बचाव साहित्य आणि पथके सज्ज४पूर परिस्थिती निर्माण झालीच तर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी त्या त्या गावातील बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तहसील कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले जीवनरक्षक जॅकेट, कटर, दोरी, बोट आदी साहित्यही सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करुन घेतली जात आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली.गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असल्याने सर्व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना नदीकाठावरील गावांना पूर्व सूचना द्याव्यात. तसेच सतर्क रहावे, अशा सूचना दिल्या आहेत.-अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारीपूर्णा तालुक्यात १२ गावे४पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीकाठावर एकूण १२ गावे असून जायकवाडी धरणातील पाणी या गाव परिसरात कधीही पोहचू शकते. त्यामुळे या गावांमध्येही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार शाम मदनूरकर यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी