शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

परभणी : गोदावरीला पाणी सोडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:25 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश रविवारी उशिरा प्रशासनाने दिले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अर्धा पावसाळा सरला तरी एकाही नदीला पूर आला नाही. कुठेही पूर परिस्थिती नसली तरी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात दररोज पाण्याची आवक सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी जायकवाडी प्रकल्पामध्ये ६३ हजार ६६ क्युसेस पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पामध्ये २५२९.४८६ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून ८२.५१ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पुढे सोडण्याची शक्यता आहे.धरणातून केव्हाही गोदावरी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते. हे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यानंतर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तसेच या काळात अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर दवंडी देऊन पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवकांना गावात थांबण्याचे सूचित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर एकूण काठावरील गावांपैकी साधारणत: ११८ गावांना पुराची शक्यता निर्माण होते. केव्हा तरी पूर येणाऱ्या गावांची नोंद निळ्या रेषेखालील गावे म्हणून केली जाते, अशी २७ गावे आहेत. तर अधिक वेळा पूर येणाºया गावांची संख्या ९१ एवढी आहे.डाव्या कालव्यातून २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यामध्ये पोहचणार आहे. जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.४त्या पार्श्वभूमीवर ११ आॅगस्टपासून २०० क्युसेस पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर अनेक भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी पाथरी, मानवत तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा पूर्णत: कोरडा असून मानवत तालुक्यातील ०.०१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या दोन तालुक्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णीक विद्युत केंद्रालाही पाणी दिले जाईल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सलगरकर यांनी दिली.बचाव साहित्य आणि पथके सज्ज४पूर परिस्थिती निर्माण झालीच तर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी त्या त्या गावातील बचाव पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तहसील कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले जीवनरक्षक जॅकेट, कटर, दोरी, बोट आदी साहित्यही सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करुन घेतली जात आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली.गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असल्याने सर्व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना नदीकाठावरील गावांना पूर्व सूचना द्याव्यात. तसेच सतर्क रहावे, अशा सूचना दिल्या आहेत.-अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारीपूर्णा तालुक्यात १२ गावे४पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीकाठावर एकूण १२ गावे असून जायकवाडी धरणातील पाणी या गाव परिसरात कधीही पोहचू शकते. त्यामुळे या गावांमध्येही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार शाम मदनूरकर यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी