शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परभणी : पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:59 IST

तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे

सुभाष सुरवसे।लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गोदावरीला पुर येत असे. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील मोठमोठे डोह भरुन संपूर्ण उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून रहात होती. त्यामुळे गोदाकाठासह परिसरातील शेतकरी ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफुल, हरभरा आदी पिके घेत असत. उन्हाळ्यात देखील गोदाकाठचा परिसर हिरवागार राहत होता; परंतु, पाच वर्षांपासून सोनपेठ तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. विहीर व बोअरची अनुक्रमे ३० ते १५० फुटावर असलेली पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, पाझर तलाव, बंधारे, शेततळे आदी पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत. बारमाही पाण्याचा खळखळाट ऐकू येणाºया गोदावरीला सुद्धा आता उतरती कळा लागली आहे. गोदावरीतील मोठमोठ्या डोहांना मार्च महिन्यातच कोरड पडली होती. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना आता पाणीटंचाईचा समाना करावा लागत आहे. बागायती शेतीला आता वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे़गोदापात्रातील विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली४सोनपेठ शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांचा पाणीप्रश्न गोदावरीवर अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. सध्यस्थितीत गोदाकाठच्या अनेक विहीर व बोअरची पाणीपातळी खालावली आहे़४गोदाकाठच्या बाजुच्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांचा वावर होता; परंतु, आज पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी ईतरत्र स्थलांतरीत होत आहेत.४एकंदरीत आजची परिस्थीती पहाता सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाचे पार वाळवंट झाल्याचे पहावयास मिळत आहे.जनावरांचे हाल४गोदावरी नदी कोरडी पडल्याने मुक्या जनावरांचेही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़ विशेषत: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे़ शेतशिवारांत पाण्याच्या ठिकाणी फिरत असताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांच्यासाठी पानवठे करण्याची मागणी होत आहे़या गावांमध्ये : केले अधिग्रहण४तालुक्यातील वंदन, तिवठाना, शेळगाव, आवलगाव, वडगाव स्टे., पोहंडूळ, पारधवाडी, लोकरवाडी या ८ गावांमध्ये १४ विहीर अधिग्रहण व उंदरवाडी, वैतागवाडी, पारधवाडी, नखतवाडी या ४ वाडी तांड्यावर ५ विहिरींचे अधिग्रहण केले असून नरवाडी आणि कोठाळा येथे दोन टँकर चालू आहेत.४मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी अख्खा दिवस घालावा लागत आहे़ त्यामुळे इतर कामे केव्हा करावीत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई