शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

परभणी : पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:59 IST

तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे

सुभाष सुरवसे।लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गोदावरीला पुर येत असे. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील मोठमोठे डोह भरुन संपूर्ण उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून रहात होती. त्यामुळे गोदाकाठासह परिसरातील शेतकरी ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफुल, हरभरा आदी पिके घेत असत. उन्हाळ्यात देखील गोदाकाठचा परिसर हिरवागार राहत होता; परंतु, पाच वर्षांपासून सोनपेठ तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. विहीर व बोअरची अनुक्रमे ३० ते १५० फुटावर असलेली पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, पाझर तलाव, बंधारे, शेततळे आदी पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत. बारमाही पाण्याचा खळखळाट ऐकू येणाºया गोदावरीला सुद्धा आता उतरती कळा लागली आहे. गोदावरीतील मोठमोठ्या डोहांना मार्च महिन्यातच कोरड पडली होती. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना आता पाणीटंचाईचा समाना करावा लागत आहे. बागायती शेतीला आता वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे़गोदापात्रातील विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली४सोनपेठ शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांचा पाणीप्रश्न गोदावरीवर अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. सध्यस्थितीत गोदाकाठच्या अनेक विहीर व बोअरची पाणीपातळी खालावली आहे़४गोदाकाठच्या बाजुच्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांचा वावर होता; परंतु, आज पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी ईतरत्र स्थलांतरीत होत आहेत.४एकंदरीत आजची परिस्थीती पहाता सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाचे पार वाळवंट झाल्याचे पहावयास मिळत आहे.जनावरांचे हाल४गोदावरी नदी कोरडी पडल्याने मुक्या जनावरांचेही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़ विशेषत: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे़ शेतशिवारांत पाण्याच्या ठिकाणी फिरत असताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांच्यासाठी पानवठे करण्याची मागणी होत आहे़या गावांमध्ये : केले अधिग्रहण४तालुक्यातील वंदन, तिवठाना, शेळगाव, आवलगाव, वडगाव स्टे., पोहंडूळ, पारधवाडी, लोकरवाडी या ८ गावांमध्ये १४ विहीर अधिग्रहण व उंदरवाडी, वैतागवाडी, पारधवाडी, नखतवाडी या ४ वाडी तांड्यावर ५ विहिरींचे अधिग्रहण केले असून नरवाडी आणि कोठाळा येथे दोन टँकर चालू आहेत.४मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी अख्खा दिवस घालावा लागत आहे़ त्यामुळे इतर कामे केव्हा करावीत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई