शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : १५ दिवसांत ३ हजार रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:48 IST

उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर यांनी १४ जानेवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार विद्युत रोहित्रे बसविण्याचे कंत्राटदारांना उद्दिष्ट दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर यांनी १४ जानेवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार विद्युत रोहित्रे बसविण्याचे कंत्राटदारांना उद्दिष्ट दिले आहे़शेतकºयांना उपलब्ध पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ या अंतर्गत ८६ कोटी रुपयेही मंजूर केले़ या रकमेतून १५ सप्टेंबर २०१८ रोजी संबंधित गुत्तेदारांना कार्यारंभ आदेशही दिले़ त्यामुळे या योजनेतून ५ हजार ५०० लाभार्थी शेतकºयांना स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळून वीज समस्यांतून सुटका मिळेल, अशी अपेक्षा होती़ योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ही मुदत दिली होती. त्यामुळे या मुदतीत पूर्ण कामे होतील, अशी आशा बाळगून असलेल्या लाभार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे़ विशेष म्हणजे, या योजनेत जवळपास १३ कंत्राटदार असून, उपकंत्राटदारांचाच भरणा झाला आहे़ त्यामुळे इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मुदत संपून दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सद्यस्थितीत केवळ १७०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम पूर्ण झाले आहे़ ३ हजार ३०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम अद्यापही बाकी आहे़ त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही रबी हंगामातील पिकांना सिंचन करताना शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली असती तर सुरळीत वीजपुरवठा होवून शेतकºयांना योजनेचा लाभ झाला असता; परंतु, कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे व अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील कामे अपूर्ण आहेत़या कामांचा आढावा घेण्यासाठी १४ जानेवारी रोजी नांदेड येथील मुख्य अधीक्षक अभियंता दत्तात्रय पाडळकर यांच्या उपस्थितीत कंत्राटदारांची बैठक परभणीत झाली़ १५ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश पाडळकर यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. कामे पूर्ण झाली नाही तर संबंधित कंत्राटदारांना बडतर्फ करून काळ्या यादीत टाकण्याचाही इशारा पाडळकर यांनी दिला आहे़ त्यामुळे ३ हजार विद्युत रोहित्र उभारताना कंत्राटदारांचे कसब पणाला लागणार आहे.उदासिन कंत्राटदारांवर कारवाई करा: लाभार्थ्यांची मागणी४वीज वितरण कंपनीकडून आतापर्यंत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, इन्फ्रा, इन्फ्रा-२ आदी योजनांची कामे दिलेल्या मुदतीत कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात आली नाहीत़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होवूनही कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे वीज वितरण कंपनी व लाभार्थी शेतकºयांचा लाभ झाला नाही़४विशेष म्हणजे, काही कंत्राटदारांनी इन्फ्रा-२ सारख्या योजनेत १५-१५ कोटी रुपयांची कामे अर्धवट सोडून पोबारा केला होता़ त्यानंतर वीज वितरण कंपनीला दुसºयांदा निविदा काढून ती कामे पूर्ण करून घ्यावी लागली़ असे असतानाही त्याच कंत्राटदारांना वीज वितरण कंपनी व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत कामे दिली आहेत़ तसेच उपकंत्राटदारांचाही मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे़ योजनेतील कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत़ त्यामुळे मुदतीत कामे पूर्ण न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना लाभार्थी शेतकºयांतून व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प