शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १५ दिवसांत ३ हजार रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:48 IST

उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर यांनी १४ जानेवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार विद्युत रोहित्रे बसविण्याचे कंत्राटदारांना उद्दिष्ट दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर यांनी १४ जानेवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार विद्युत रोहित्रे बसविण्याचे कंत्राटदारांना उद्दिष्ट दिले आहे़शेतकºयांना उपलब्ध पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ या अंतर्गत ८६ कोटी रुपयेही मंजूर केले़ या रकमेतून १५ सप्टेंबर २०१८ रोजी संबंधित गुत्तेदारांना कार्यारंभ आदेशही दिले़ त्यामुळे या योजनेतून ५ हजार ५०० लाभार्थी शेतकºयांना स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळून वीज समस्यांतून सुटका मिळेल, अशी अपेक्षा होती़ योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ही मुदत दिली होती. त्यामुळे या मुदतीत पूर्ण कामे होतील, अशी आशा बाळगून असलेल्या लाभार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे़ विशेष म्हणजे, या योजनेत जवळपास १३ कंत्राटदार असून, उपकंत्राटदारांचाच भरणा झाला आहे़ त्यामुळे इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मुदत संपून दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सद्यस्थितीत केवळ १७०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम पूर्ण झाले आहे़ ३ हजार ३०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम अद्यापही बाकी आहे़ त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही रबी हंगामातील पिकांना सिंचन करताना शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली असती तर सुरळीत वीजपुरवठा होवून शेतकºयांना योजनेचा लाभ झाला असता; परंतु, कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे व अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील कामे अपूर्ण आहेत़या कामांचा आढावा घेण्यासाठी १४ जानेवारी रोजी नांदेड येथील मुख्य अधीक्षक अभियंता दत्तात्रय पाडळकर यांच्या उपस्थितीत कंत्राटदारांची बैठक परभणीत झाली़ १५ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश पाडळकर यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. कामे पूर्ण झाली नाही तर संबंधित कंत्राटदारांना बडतर्फ करून काळ्या यादीत टाकण्याचाही इशारा पाडळकर यांनी दिला आहे़ त्यामुळे ३ हजार विद्युत रोहित्र उभारताना कंत्राटदारांचे कसब पणाला लागणार आहे.उदासिन कंत्राटदारांवर कारवाई करा: लाभार्थ्यांची मागणी४वीज वितरण कंपनीकडून आतापर्यंत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, इन्फ्रा, इन्फ्रा-२ आदी योजनांची कामे दिलेल्या मुदतीत कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात आली नाहीत़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होवूनही कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे वीज वितरण कंपनी व लाभार्थी शेतकºयांचा लाभ झाला नाही़४विशेष म्हणजे, काही कंत्राटदारांनी इन्फ्रा-२ सारख्या योजनेत १५-१५ कोटी रुपयांची कामे अर्धवट सोडून पोबारा केला होता़ त्यानंतर वीज वितरण कंपनीला दुसºयांदा निविदा काढून ती कामे पूर्ण करून घ्यावी लागली़ असे असतानाही त्याच कंत्राटदारांना वीज वितरण कंपनी व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत कामे दिली आहेत़ तसेच उपकंत्राटदारांचाही मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे़ योजनेतील कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत़ त्यामुळे मुदतीत कामे पूर्ण न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना लाभार्थी शेतकºयांतून व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प