शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

परभणी : गंगाखेड, जिंतूर, पूर्णेत दुष्काळ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळासृदश्य परिस्थिती जाहीर केली होती़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यांत गंभीर तर परभणी, पालम व सेलू तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले होते़ आता केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले़ त्यामध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची सत्यमापन समितीकडून तपासणी करण्यात आली़ त्यातील निष्कर्षानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने राज्यातील १८० तालुक्यांपैकी २९ तालुके या यादीतून वगळले आहेत़ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांपैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा तर २९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर या तीन तालुक्यांचा समावेश होईल, असे वाटले होते; परंतु, या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३१ आॅक्टोबरच्या आदेशानुसार निराशा झाली आहे़ यापूर्वी मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले परभणी, पालम व सेलू हे तीन तालुके आता गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत़ या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, पेरणीचे क्षेत्र व पिकांची स्थिती आदी बाबींचा अभ्यास करून तालुक्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत़सुधारित हंगामी पैसेवारीचा कौल गंगाखेड, जिंतूरच्या बाजुने४महसूल विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या परभणी तालुक्याची पैेसेवारी ४४ पैसे, पालम ४० पैसे, पाथरी ४२.५७ पैसे, सोनपेठ ४३.९२, मानवत ४२.४९, सेलू ४६ पैसे अशी आहे. तर गंगाखेड तालुक्याची ४३.७९ व जिंतूर तालुक्याची ४७ पैसे सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित झाली आहे. या दोन्ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून या संदर्भात सुधारित निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्णा तालुक्यात मात्र महसूलच्या अहवालानुसार ९४ ते ९५ टक्के पाऊस झाल्याने ५४.२५ पैसे सुधारित पैसेवारी आली आहे. त्यामुळे हा तालुका सध्या तरी दुष्काळ जाहीर होण्यापासून बराच दूर आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर दुष्काळाची खरी परिस्थिती जाहीर होणार आहे.४७९ गावांना सवलती४दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७९ गावांना दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १११, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० व सेलू तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे़४या ४७९ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कर्जाचे पूनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामात शिथिलता, आवश्यक तेथे पाण्याच्या टँकरचा वापर व दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांंनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार