शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

परभणी : पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:43 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पीकविमा देण्यासंदर्भात झालेल्या चुका शासनाने मंगळवारी नागपूर येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत कबूल केल्या आहेत़ त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाºया शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पीकविमा देण्यासंदर्भात झालेल्या चुका शासनाने मंगळवारी नागपूर येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत कबूल केल्या आहेत़ त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाºया शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले आहे़गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा देण्यासंदर्भात रिलायन्स विमा कंपनीने शेतकºयांवर अन्याय केल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत आणि शेतकºयांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी २६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करीत आहेत़ या अनुषंगाने मंगळवारी नागपूर येथे राज्याचे कृषीमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली़ या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकºयांच्या शिष्टमंडळाने पीक विमा कंपनीच्या कारभाराचे पुराव्यासह वाभाडे काढले़ तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनीही कशा पद्धतीने चुकीची माहिती सादर केली, ज्यामुळे अन्याय झाला याबाबतचीही पुराव्यासह व्यथा मांडली़ केंद्र शासनाचा प्रधानमंत्री पीकविम्यासंदर्भातील निर्णय बाजुला ठेवून चुकीचे कसे निकष लावले? याबाबतचीही माहिती सांगण्यात आली़ त्यानंतर कृषीमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकात झालेली चूक कबूल केली़ तसेच परिपत्रकात बदल करून मंडळनिहाय सर्वेक्षणाचा निर्णय घेतला़ मागील वर्षी जो ५३ दिवसांचा पावसाचा खंड होता, तो देखील ग्राह्य धरून त्याची नोंद घेण्यात आली़ तसेच जे उंंबरठा उत्पन्न सात वर्षांचे केले जाते़ त्यात दोन वर्षे जरी पर्जन्यमान चांगले झाले असले तरी पाच वर्षांत सरासरी उत्पन्न पूर्णत: घटले आहे़ याचाही यावेळी सकारात्मक विचार करण्यात आला़ त्यानंतर झालेल्या चर्चेअंती कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना लवकरच पीकविमा मिळेल, असे सांगितले़ या बैठकीस आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विप्लव बाजोरिया, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ़ विजय गव्हाणे, कृषीचे मुख्य सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त एस़पी़सिंह, कॉ़ राजन क्षीरसागर, कॉ़ विलास बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, सुभाष जावळे, रवि पतंगे, गणेश रोकडे, प्रविण देशमुख, भाऊसाहेब गिराम, विठ्ठलराव दुधाटे, विश्वंभर गोरवे, शिवाजी दुधाटे व रिलायन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते़शेतकºयांच्या सर्व मागण्या मान्य-पाटीलपरभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे़ या संदर्भात आपण नागपूरच्या अधिवेशनात आंदोलन केले होते़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात भेट घेऊन त्यांना पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती़ त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सोबत घेऊन मंगळवारी नागपुरात बैठक झाली़ या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला आहे़ शासनाने आपली चूक कबूल केली आहे़ त्यामुळे लवकरच शेतकºयांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळणार आहे़ शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यास आपले नेहमीच प्राधान्य राहिले असून, पीक विम्याचाही प्रश्न सोडविण्यात यश मिळाले, यात आपले समाधान आहे़शेतकºयांच्या हक्काचा पीकविमा - विजय भांबळेजिल्ह्यातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळावा, यासाठी आपण नागपुरात आंदोलन केले़ त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभेत २९३ प्रस्तावांतर्गत मुद्दा उपस्थित केला़ त्याची तत्काळ शासनाने दखल घेतली़ त्यानंतर कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली़ त्यात सकारात्मक निर्णय झाला़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीकविमा मिळणार आहे़ यापुढील काळातही शेतकºयांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला जाईल व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील, असे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी