शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:22 IST

पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

मोहन बोराडे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.गतवर्षी दुधना प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे दोन्ही कालव्याद्वारे रबी हंगाम व उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात आले होते. तसेच परभणी, पूर्णा व नांदेड या शहरांना नदीपात्राद्वारे पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही शहरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला होता; परंतु, यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे दुधनात समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. जून व आॅगस्ट महिन्यातील काही दिवसच पाऊस पडला. तोही भीज पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होऊ शकली नाही. दरवर्षी परतीच्या पावसामुळे दुधनेची पाणीपातळी वाढते. मात्र यंदा परतीचा पाऊस न बरसताच परतल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आगामी काळात प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले झाले आहे. आगामी नऊ महिने विनापावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा विचार केला असता नदीपात्राद्वारे पाणी सोडणे शक्य होणार नाही. कारण नदीपात्राद्वारे पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. परिणामी पाणीसाठा वेगाने कमी होतो. दरम्यान, परतीच्या पावसाच्या आशा माळल्याने उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे.दुधनेवर तीन शहरांची मदारदुधना प्रकल्पातून सेलू तसेच जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर या शहरांना व आठगाव पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वर्षाकाठी या योजनेला सुमारे ६ दलघमी पाणी लागते. येलदरी प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने परभणी व पूर्णा शहराला दुधनेतून पाणी देण्यात आले; परंतु, सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा नसल्याने दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. सेलू, मंठा व परतूर शहराला सद्यस्थितीत तरी पाणीटंचाई भासणार नाही.२२ टक्के जिवंत साठासध्या दुधना प्रकल्पात एकूण १५६.८८ दलघमी पाणीसाठा असून तो ४५.५७ टक्के आहे. यातील ५४.२८ दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २२.४१ टक्के आहे. पाटबंधारे विभागामार्फत १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा समजला जातो. त्यामुळे ३१ आॅक्टोबरनंतर प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण