शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:22 IST

पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

मोहन बोराडे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.गतवर्षी दुधना प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे दोन्ही कालव्याद्वारे रबी हंगाम व उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात आले होते. तसेच परभणी, पूर्णा व नांदेड या शहरांना नदीपात्राद्वारे पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही शहरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला होता; परंतु, यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे दुधनात समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. जून व आॅगस्ट महिन्यातील काही दिवसच पाऊस पडला. तोही भीज पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होऊ शकली नाही. दरवर्षी परतीच्या पावसामुळे दुधनेची पाणीपातळी वाढते. मात्र यंदा परतीचा पाऊस न बरसताच परतल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आगामी काळात प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले झाले आहे. आगामी नऊ महिने विनापावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा विचार केला असता नदीपात्राद्वारे पाणी सोडणे शक्य होणार नाही. कारण नदीपात्राद्वारे पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. परिणामी पाणीसाठा वेगाने कमी होतो. दरम्यान, परतीच्या पावसाच्या आशा माळल्याने उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे.दुधनेवर तीन शहरांची मदारदुधना प्रकल्पातून सेलू तसेच जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर या शहरांना व आठगाव पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वर्षाकाठी या योजनेला सुमारे ६ दलघमी पाणी लागते. येलदरी प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने परभणी व पूर्णा शहराला दुधनेतून पाणी देण्यात आले; परंतु, सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा नसल्याने दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. सेलू, मंठा व परतूर शहराला सद्यस्थितीत तरी पाणीटंचाई भासणार नाही.२२ टक्के जिवंत साठासध्या दुधना प्रकल्पात एकूण १५६.८८ दलघमी पाणीसाठा असून तो ४५.५७ टक्के आहे. यातील ५४.२८ दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २२.४१ टक्के आहे. पाटबंधारे विभागामार्फत १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा समजला जातो. त्यामुळे ३१ आॅक्टोबरनंतर प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण