शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

परभणी : शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीत साडेचार तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ सप्टेंबरपासून सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथून पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातून पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शुक्रवारी परभणीत दुपारी १ वाजेच्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर दाखल झाली. यावेळी समोरच्या पोर्चमध्येच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष माऊली कदम, अण्णा जोदगंड, विश्वांभर गोरवे, किरण चक्रपाणी, कॉ.विलास बाबर, अनंतराव कदम, अमृतराव शिंदे, बंडू सोळंके, माधवराव जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड, किशनराव मुलगीर, भारत गोरवे, भूजबळ, शिवाजीराव बोबडे, नितीन जाधव, मंगेश तांदुळवाडीकर, स्वप्नील कटारे आदींची उपस्थिती होती. यावेळी गतवर्षी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व शेतकºयांना पीक विमा देण्यात यावा. तसेच मूग, उडीद पीक काढण्यात आले आहे. पोळा व महालक्ष्मीचा सण तोंडावर असताना बाजारपेठेत विक्रीची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या संदर्भात संबंधितांना खरेदीचे आदेश देण्यात यावेत. शेतकºयांना बँका पीक कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. जिल्हाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर परभणी बाजार समितीत शेतकºयांचा उडीद व मूग खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटे सुरु करण्यात येतील, आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेला ट्रॅक्टरमधील मूग बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटा करुन आवकची नोंद घेतली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बँकांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच पीक विम्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. तब्बल साडेचारतास झालेल्या आंदोलनानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे आंदोलन संपले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी