शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीत साडेचार तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ सप्टेंबरपासून सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथून पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातून पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शुक्रवारी परभणीत दुपारी १ वाजेच्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर दाखल झाली. यावेळी समोरच्या पोर्चमध्येच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष माऊली कदम, अण्णा जोदगंड, विश्वांभर गोरवे, किरण चक्रपाणी, कॉ.विलास बाबर, अनंतराव कदम, अमृतराव शिंदे, बंडू सोळंके, माधवराव जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड, किशनराव मुलगीर, भारत गोरवे, भूजबळ, शिवाजीराव बोबडे, नितीन जाधव, मंगेश तांदुळवाडीकर, स्वप्नील कटारे आदींची उपस्थिती होती. यावेळी गतवर्षी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व शेतकºयांना पीक विमा देण्यात यावा. तसेच मूग, उडीद पीक काढण्यात आले आहे. पोळा व महालक्ष्मीचा सण तोंडावर असताना बाजारपेठेत विक्रीची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या संदर्भात संबंधितांना खरेदीचे आदेश देण्यात यावेत. शेतकºयांना बँका पीक कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. जिल्हाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर परभणी बाजार समितीत शेतकºयांचा उडीद व मूग खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटे सुरु करण्यात येतील, आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेला ट्रॅक्टरमधील मूग बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काटा करुन आवकची नोंद घेतली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बँकांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच पीक विम्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. तब्बल साडेचारतास झालेल्या आंदोलनानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे आंदोलन संपले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी