शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST

बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.२०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया गेल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. या शेतकºयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करुन राज्य शासनाकडे १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मागणी केली होती.दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक अध्यादेश काढून राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर केली. परभणी जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार आहे.१५७ कोटी रुपयांचे तीन समान टप्पे करण्यात आले असून त्यात ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या याद्याप्रमाणे हे अनुदान त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या खात्यावर वितरित केले आहे. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष शेतकºयांना अनुदानाच्या वाटपास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले असले तरी शेतकºयांच्या खात्यावर त्यांच्या नुकसानीची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप होणार आहे. ऐन पेरणी हंगामाच्या पूर्वी बोंडअळीचे पैसे खात्यात पडणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी तालुक्याला सर्वाधिक निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक तालुक्याला निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्यात परभणी तालुक्याला सर्वाधिक ६ कोटी ८८ लाख ९१ हजार ७३६ रुपये, सेलू तालुक्याला ६ कोटी ५९ लाख ७९ हजार ९६७ , जिंतूर तालुक्याला ६ कोटी ४३ लाख ११ हजार ९१८, पाथरी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७, मानवत ५ कोटी ३२ लाख ९१ हजार ४२०, सोनपेठ ४ कोटी २० लाख २५ हजार २२३, गंगाखेड ३ कोटी २६ लाख १ हजार २१, पालम ३ कोटी ४ लाख २५ हजार ५६५ आणि पूर्णा तालुक्याला २ कोटी १४ लाख ४३ हजार ९२३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.५२ कोटींचा मिळाला पहिला हप्ताराज्य शासनाकडे जिल्ह्याने १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मागविली होती. त्याचा पहिला हप्ता ५२ कोटी ६६ लाख रुपये शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी बिम्स् प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे. हा संपूर्ण निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीcottonकापूस