शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST

बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.२०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया गेल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. या शेतकºयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करुन राज्य शासनाकडे १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मागणी केली होती.दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक अध्यादेश काढून राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर केली. परभणी जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार आहे.१५७ कोटी रुपयांचे तीन समान टप्पे करण्यात आले असून त्यात ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या याद्याप्रमाणे हे अनुदान त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या खात्यावर वितरित केले आहे. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष शेतकºयांना अनुदानाच्या वाटपास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले असले तरी शेतकºयांच्या खात्यावर त्यांच्या नुकसानीची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप होणार आहे. ऐन पेरणी हंगामाच्या पूर्वी बोंडअळीचे पैसे खात्यात पडणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी तालुक्याला सर्वाधिक निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक तालुक्याला निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्यात परभणी तालुक्याला सर्वाधिक ६ कोटी ८८ लाख ९१ हजार ७३६ रुपये, सेलू तालुक्याला ६ कोटी ५९ लाख ७९ हजार ९६७ , जिंतूर तालुक्याला ६ कोटी ४३ लाख ११ हजार ९१८, पाथरी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७, मानवत ५ कोटी ३२ लाख ९१ हजार ४२०, सोनपेठ ४ कोटी २० लाख २५ हजार २२३, गंगाखेड ३ कोटी २६ लाख १ हजार २१, पालम ३ कोटी ४ लाख २५ हजार ५६५ आणि पूर्णा तालुक्याला २ कोटी १४ लाख ४३ हजार ९२३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.५२ कोटींचा मिळाला पहिला हप्ताराज्य शासनाकडे जिल्ह्याने १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मागविली होती. त्याचा पहिला हप्ता ५२ कोटी ६६ लाख रुपये शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी बिम्स् प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे. हा संपूर्ण निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीcottonकापूस