शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST

बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.२०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया गेल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. या शेतकºयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करुन राज्य शासनाकडे १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मागणी केली होती.दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक अध्यादेश काढून राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर केली. परभणी जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार आहे.१५७ कोटी रुपयांचे तीन समान टप्पे करण्यात आले असून त्यात ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या याद्याप्रमाणे हे अनुदान त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या खात्यावर वितरित केले आहे. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष शेतकºयांना अनुदानाच्या वाटपास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले असले तरी शेतकºयांच्या खात्यावर त्यांच्या नुकसानीची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप होणार आहे. ऐन पेरणी हंगामाच्या पूर्वी बोंडअळीचे पैसे खात्यात पडणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी तालुक्याला सर्वाधिक निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक तालुक्याला निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्यात परभणी तालुक्याला सर्वाधिक ६ कोटी ८८ लाख ९१ हजार ७३६ रुपये, सेलू तालुक्याला ६ कोटी ५९ लाख ७९ हजार ९६७ , जिंतूर तालुक्याला ६ कोटी ४३ लाख ११ हजार ९१८, पाथरी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७, मानवत ५ कोटी ३२ लाख ९१ हजार ४२०, सोनपेठ ४ कोटी २० लाख २५ हजार २२३, गंगाखेड ३ कोटी २६ लाख १ हजार २१, पालम ३ कोटी ४ लाख २५ हजार ५६५ आणि पूर्णा तालुक्याला २ कोटी १४ लाख ४३ हजार ९२३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.५२ कोटींचा मिळाला पहिला हप्ताराज्य शासनाकडे जिल्ह्याने १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मागविली होती. त्याचा पहिला हप्ता ५२ कोटी ६६ लाख रुपये शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी बिम्स् प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे. हा संपूर्ण निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीcottonकापूस