शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : आठवड्याचा पहिलाच दिवस ठरला आंदोलनवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:39 IST

सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आंदोलनवार ठरला असून जिल्हा कचेरीसमोर सोमवारी विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आंदोलनवार ठरला असून जिल्हा कचेरीसमोर सोमवारी विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या पिक कर्जाच्या अनुषंगाने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे यापूर्वी कर्ज दिलेल्यांना अचानक कर्ज वाटप बंद करुन दत्तक बँकेकडे शेतकºयांना अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांना दत्तक बँका किंवा जिल्हा बँकेने कर्ज दिलेले नाही. त्यामुळे हे शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा बँकेने अत्यंत कमी पीक कर्ज वाटप केले असून कर्जमाफीमधून उपलब्ध झालेला शासनाचा निधी बिगर शेती कर्ज वाटपाकडे वळविण्यात आल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला आहे. थकबाकीदारांना पीक कर्जाचे वाटप करावे, गोदावरी दुधना, पूर्णा धरण लाभक्षेत्रातील शेतकºयांना सिंचनासाठी सबसिडी द्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कॉ.क्षीरसागर यांच्यासह नवनाथ कोल्हे, अर्जून समिंद्रे, शिवाजी कदम, कॉ.ज्ञानेश्वर काळे, मोहन शिंदे, आर.डी.जायभाये, जी.एस.टापरे, एकनाथ जाधव, माणिक वीटकर, ज्ञानेश्वर निलवर्ण, भास्कर तिर्थे, मधुकर थिटे,सुधाकर मस्के, प्रभाकर शातलवार, विष्णू कच्छवे, वामन सूर्यवंशी, दत्तात्रय पवार आदी शेतकºयांनी सहभाग नोंदविला.अपंगांच्या मागण्यांबाबत उपोषणदिव्यागांच्या ३ टक्के निधीबाबत मनपा प्रशासन उदासीन भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ तसेच दिव्यांग, विधवा, परितक्त्या यांच्या घरकुल प्रश्नावर जिल्हा कचेरीसमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये २०११ चा शासन निर्णय रद्द करुन रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना विनाअट घरकुल योजना मंजूर करावी, दिव्यागांना ३ टक्के निधी विलंब न लावता मानधन स्वरुपात देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. निवेदनावर संजय वाघमारे, राजेश तिपाले, शैलेश नवघडे, सुनील लहाने, किरण काळे, प्रदीप गांधारे, गौस शेख, बिबन कुरेशी, मतीन शेख, रमेश खंडागळे, संतोष जोंधळे, ज्ञानेश्वर ढाले, गौतम मुळे, सोनबा पाईकराव, मुरली गरड, सुरेश वाव्हळे, प्रकाश इंगळे, गणेश घोडके, नितीन भराडे आदींची नावे आहेत.गटसचिवांचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्यावेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने जिल्ह्यातील गटसचिवांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुपारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील गटसचिवांचे वेतन वसुलीच्या प्रमाणात अदा करावे, असे आदेश दिलेले असतानाही गटसचिवांच्या वेतनासाठी टाळाटाळ केली जात आहे. पत्र व्यवहाराच्या पुढे कुठलीही कारवाई झाली नसल्याने गटसचिवांचे जवळपास १५ ते १६ महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गटसचिवांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याच मागणीसाठी गटसचिवांनी १९ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले असून सोमवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील गटसचिव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कायम करण्यासाठी वनकामगारांचे उपोषणपरभणी : वन विभागाच्या सेवेत कायम करावे, या मागणीसाठी वन विभागातील कामगारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.१९९४ ते २००४ या काळात वन विभागात काम करणाºया कामागरांना शासनाने सेवेत कायम करणे आवश्यक आहे. परंतु अद्याप शासनाने हा निर्णय घेतला नाही. त्यामुळे या कामगारांना सेवेत सामावून घ्यावे तसेच या काळात मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना त्यांचा हक्क द्यावा, वयोवृद्ध कामगारांनाही कायमस्वरुपी सेवेत घ्यावे आदी मागण्यांसाठी कामगारांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. या आंदोलनात सुमारे १०० कामगार सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी