शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:54 IST

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी पालिकेत अग्निशमन दल उभारण्यात यावे, अशी मागणी करीत शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ रोजी या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी शासनाने ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचारी निवासाकरिता ३६ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्निशमन दलासाठी लागणारे वाहन, यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने तीन रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालवावा लागत आहे. पाच वर्षापासून नगरपरिषद संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने रोजंदारी कर्मचाºयांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी-१, चालक- १ , फायरमन ४ या पदांचा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे होईल.राज्यस्तरावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरती संदर्भात निर्णय झाल्यास योग्य तो पाठपुरावा केला जाईल.-उमेश ढाकणे,मुख्याधिकारी, नगरपालिका मानवत,तालुक्यातील ५२ गावांसह शहराला प्रशिक्षित कायमस्वरुपी कर्मचारी असलेल्या अग्निशमन दलाचा उपयोग होणार आहे. कर्मचारी भरती संदर्भात नगर परिषद संचालनालय महाराष्टÑ राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाºयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.-डॉ. अंकुश लाड,मानवतशहरात एकूण १४ जिनिंग युनिट आहेत. त्यापैकी १२ सुरू आहेत. या युनिटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. प्रशिक्षित कर्मचारी असल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळविता येते. यामुळे नुकसान कमी होते.-गिरीश कत्रुवार, अध्यक्ष जिनिंग असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगEmployeeकर्मचारी