शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:54 IST

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी पालिकेत अग्निशमन दल उभारण्यात यावे, अशी मागणी करीत शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ रोजी या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी शासनाने ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचारी निवासाकरिता ३६ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्निशमन दलासाठी लागणारे वाहन, यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने तीन रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालवावा लागत आहे. पाच वर्षापासून नगरपरिषद संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने रोजंदारी कर्मचाºयांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी-१, चालक- १ , फायरमन ४ या पदांचा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे होईल.राज्यस्तरावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरती संदर्भात निर्णय झाल्यास योग्य तो पाठपुरावा केला जाईल.-उमेश ढाकणे,मुख्याधिकारी, नगरपालिका मानवत,तालुक्यातील ५२ गावांसह शहराला प्रशिक्षित कायमस्वरुपी कर्मचारी असलेल्या अग्निशमन दलाचा उपयोग होणार आहे. कर्मचारी भरती संदर्भात नगर परिषद संचालनालय महाराष्टÑ राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाºयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.-डॉ. अंकुश लाड,मानवतशहरात एकूण १४ जिनिंग युनिट आहेत. त्यापैकी १२ सुरू आहेत. या युनिटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. प्रशिक्षित कर्मचारी असल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळविता येते. यामुळे नुकसान कमी होते.-गिरीश कत्रुवार, अध्यक्ष जिनिंग असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगEmployeeकर्मचारी