शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:54 IST

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी पालिकेत अग्निशमन दल उभारण्यात यावे, अशी मागणी करीत शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ रोजी या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी शासनाने ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचारी निवासाकरिता ३६ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्निशमन दलासाठी लागणारे वाहन, यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने तीन रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालवावा लागत आहे. पाच वर्षापासून नगरपरिषद संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने रोजंदारी कर्मचाºयांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी-१, चालक- १ , फायरमन ४ या पदांचा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे होईल.राज्यस्तरावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरती संदर्भात निर्णय झाल्यास योग्य तो पाठपुरावा केला जाईल.-उमेश ढाकणे,मुख्याधिकारी, नगरपालिका मानवत,तालुक्यातील ५२ गावांसह शहराला प्रशिक्षित कायमस्वरुपी कर्मचारी असलेल्या अग्निशमन दलाचा उपयोग होणार आहे. कर्मचारी भरती संदर्भात नगर परिषद संचालनालय महाराष्टÑ राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाºयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.-डॉ. अंकुश लाड,मानवतशहरात एकूण १४ जिनिंग युनिट आहेत. त्यापैकी १२ सुरू आहेत. या युनिटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. प्रशिक्षित कर्मचारी असल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळविता येते. यामुळे नुकसान कमी होते.-गिरीश कत्रुवार, अध्यक्ष जिनिंग असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगEmployeeकर्मचारी