शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

परभणी : मागणीनंतरही मिळेनात कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:07 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.तालुक्यात यावर्षी गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी रबीच्या पेरण्या रखडल्या. त्यामुळे शेतात कामे शिल्लक नाहीत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर वाढत चालले आहे. हे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत; परंतु, केवळ कागदोपत्रीच कामे असल्याचे दाखविले जात आहे. तालुक्यातील तीन गावांमधील ११५ मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाची मागणी केली आहे. त्यामध्ये रेणापूर येथील ४०, कासापुरी येथील ३० आणि बाभळगाव येथील ४५ मजुरांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालय पाथरी यांच्याकडे या मजुरांनी कामे मागितली आहेत. मात्र अद्याप मजुरांना कामे उपलब्ध झाली नाहीत.मनरेगाची अंमलबजावणी होईना४पाथरी तालुक्यात यावर्षी गंभीर दुष्काळ आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. आणि मनरेगाची कामे सुरू होत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. पंचायत समितीमार्फत केवळ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. त्यासाठी विहीर खोदणारे मजुरच लागतात. इतर मजुरांच्या हाताला मात्र काम मिळत नसल्याने मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. सामाजिक वनीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यातून कोणतेही कामे सुरू केली नाही. बांधकाम विभागामार्फत शेतरस्त्याची कामे घेतली जातात. तालुक्यात या विभागाकडे सहा कामांचा सेल्फ उपलब्ध आहे. असे असले तरी या विभागाकडून कामे हाती घेतली जात नाहीत. कामाची मागणी मजुरांकडून होत असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कामे देत नसल्याचे दिसत आहे.‘लोकमत’च्या वृत्ताची तहसील प्रशासनाने घेतली दखलतालुक्यामध्ये ‘दुष्काळी उपाययोजनांचा दुष्काळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १८ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. सार्वजनिक बांधकाम आणि इतर विभागाची कामे तालुक्यात सुरू नसल्याचे या वृत्ताच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर आता कुठे महसूलने कडक पावले उचलली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार