शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

परभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:11 IST

मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़कामात पारदर्शकपणा व गतीमानता आणण्याच्या उद्देशाने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ई-आॅफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कार्यालय पेपरलेस करून या संदर्भातील फाईल स्कॅन करून डिजीटल सहीच्या माध्यमातून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविली जात होती़ त्यामुळे कोणत्या टेबलवर, कोणती फाईल किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची इत्यंभूत माहिती कार्यालयप्रमुखांना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत होती़ ही प्रणाली पारदर्शक असल्याने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रणाली लागू करण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला़ ई-आॅफीस प्रणाली लागू करण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींची कमतरता असताना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही मिळाले नसताना विशेष बाब म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी परवानगी देण्यात आली़ त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई-आॅफीस प्रणाली सुरू करण्यात आली़ त्यानंतर आलेली प्रत्येक फाईल स्कॅन करून ती डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून संबंधित टेबलवरून जबाबदार अधिकाºयांमार्फत पूर्ण होऊ लागली़ जवळपास २४ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत होती़ २४ मे रोजी अचानक मुंबईतील मंत्रालयातील ई-आॅफीस प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व ई-आॅफीसची संपूर्ण प्रक्रिया बंद पडली़ त्यामुळे परभणीसह औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी जिल्ह्यांमधील ई-आॅफीसचे कामकाज ठप्प झाले़ १५ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास बºयाच प्रयत्नानंतर मुंबईतून ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत झाली़ त्यानंतर एका फाईलवरून दुसरी फाईल पाठविली जाऊ लागली; परंतु, जुन्या प्रकरणातील फाईल्स व या संदर्भातील डाटा दिसेनासा झाला़ गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत़यासाठी मुंबईतील मुख्य सर्व्हरच्या ठिकाणी एनआयसीमार्फत संपर्क साधण्यात येत आहे; परंतु, जुना डाटा रिकव्हरच होत नाही़ त्यामुळे १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या १ हजारापेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ अशातच आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी व त्यानंतरच्या प्रकरणातील फाईल्सवर काय निर्णय झाले? यासाठीचा पाठपुरावा संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू लागले आहेत़ अशा नागरिकांना किंवा लोकप्रतिनिधींना या संदर्भात उत्तरे देताना अधिकारी व कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत़ १९ जून रोजीही जिल्हाधिकारी कार्यालयात असाच प्रकार घडला़ त्यामुळे काय करावे? असा प्रश्न अधिकारी व कर्मचाºयांसमोर उपस्थित झाला आहे़विविध विभागांच्या कामकाजावर होतोय परिणामच्जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीचे कामकाज १५ जून रोजी सायंकाळी ६ नंतर पूर्ववत झाले़ त्यानंतर गेल्या १७ जूनपासून ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कामकाज सुरू आहे़च्असे असले तरी १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या जुन्या फाईल्स कोणाच्या टेबलवर प्रलंबित आहेत, हेच कळेनासे झाले आहे़ त्यामुळे या फाईल्सवरील कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत़च्यावेळी या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी- कर्मचारी हतबल होत आहेत़ यातून वादा-वादीचे प्रकार घडत आहेत़ परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे़मुंबईहून सुरळीत होण्याचाच सातत्याने मिळतोय निरोपजिल्हा कचेरीतील जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांच्यापर्यंत सोमवारी जिंतूर तालुक्यातील एक प्रकरण गेले़ यावेळी त्यांनी मुंबई येथील प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना लवकरच जुना डाटा रिकव्हर करून दिला जाईल, असे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात दिवसभर तसे घडलेच नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी