शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

परभणी : पोहेटाकळीत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी : तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटले असून, पाणीपुरवठा योजनेची विहीरही कोरडीठाक पडली आहे़ परिणामी, ग्रामस्थांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटले असून, पाणीपुरवठा योजनेची विहीरही कोरडीठाक पडली आहे़ परिणामी, ग्रामस्थांना दोन-तीन किमीची पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे़यावर्षी तालुक्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाले़ परतीच्या पावसानेही तालुक्याकडे पाठ फिरविली़ परिणामी, राज्य शासनाने या तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला़ पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी काही वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत ३० लाख रुपयांचा खर्च करून विहीर व जलकुंभ उभारण्यात आले़ या योजनेद्वारे आतापर्यंत ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यातच पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे़ त्याचबरोबर गावामध्ये सार्वजनिक ९ हातपंप आहेत़ हे हातपंपही आटले आहेत़ परिणामी, गावातील ग्रामस्थांना कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ रोजंदारीवर उपजीविका भागविणाऱ्या ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. गावातील बहुतांश ग्रामस्थांनी २० एप्रिल रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी़एस़ बायस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली; परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना गावानजीकचे ५०० मीटर अंतरावरील पाण्याचे स्त्रोत ताब्यात घेण्यात यावेत, असे सांगितले आहे़ प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीही पाण्याची सुविधा ग्रामस्थांना करून देण्यात आली नाही़ परिणामी, भर उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे़तातडीने उपाययोजना करण्याची गरजच्पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी २ ते ३ किमीची पायपीट करावी लागत आहे़ गावातील जलस्त्रोत आटल्याने ५०० मीटरमधील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहणासाठी उपलब्ध होणार नाहीत़ त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन टँकर सुरू करून ग्रामस्थांची तहान भागवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़च्एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या तीव्र झळांना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे जून महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे़ त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ