शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:58 IST

राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाकडे बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन पीक लागले आहे. त्याची काढणीही झाली आहे. सोयाबीनचा शेतमाल बाजारपेठेत येत आहे; परंतु, राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक असताना व्यापारी मात्र कवडीमोल दराने शेतकºयांचा माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिकांवर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्याने ज्या शेतकºयांना एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीनचा उतारा यायचा त्या शेतकºयांना आता एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनवरच समाधान मानावे लागत आहे.त्यामुळे सध्या शेतकºयांची पुढे आड मागे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.प्रति क्विंटल २ हजारांचा बसला फटका४यावर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला केंद्र शासनाने ६ हजार ९७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यामुळे ज्या शेतकºयांनी मुगाचे उत्पन्न घेतले. त्या शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, नाफेडने जिल्ह्यात कोठेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे ज्या शेतकºयांना पैशाची निकड होती, त्या शेतकºयांनी बाजार समितीतील व्यापाºयांना आपल्या शेतमालाची विक्री केली. व्यापाºयांनीही शेतकºयांच्या अडचणींचा फायदा घेत ४००० ते ४५०० रुपयांनीच मुगाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी