शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:58 IST

राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाकडे बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन पीक लागले आहे. त्याची काढणीही झाली आहे. सोयाबीनचा शेतमाल बाजारपेठेत येत आहे; परंतु, राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक असताना व्यापारी मात्र कवडीमोल दराने शेतकºयांचा माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिकांवर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्याने ज्या शेतकºयांना एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीनचा उतारा यायचा त्या शेतकºयांना आता एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनवरच समाधान मानावे लागत आहे.त्यामुळे सध्या शेतकºयांची पुढे आड मागे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.प्रति क्विंटल २ हजारांचा बसला फटका४यावर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला केंद्र शासनाने ६ हजार ९७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यामुळे ज्या शेतकºयांनी मुगाचे उत्पन्न घेतले. त्या शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, नाफेडने जिल्ह्यात कोठेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे ज्या शेतकºयांना पैशाची निकड होती, त्या शेतकºयांनी बाजार समितीतील व्यापाºयांना आपल्या शेतमालाची विक्री केली. व्यापाºयांनीही शेतकºयांच्या अडचणींचा फायदा घेत ४००० ते ४५०० रुपयांनीच मुगाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी