शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:58 IST

राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाकडे बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन पीक लागले आहे. त्याची काढणीही झाली आहे. सोयाबीनचा शेतमाल बाजारपेठेत येत आहे; परंतु, राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक असताना व्यापारी मात्र कवडीमोल दराने शेतकºयांचा माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिकांवर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्याने ज्या शेतकºयांना एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीनचा उतारा यायचा त्या शेतकºयांना आता एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनवरच समाधान मानावे लागत आहे.त्यामुळे सध्या शेतकºयांची पुढे आड मागे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.प्रति क्विंटल २ हजारांचा बसला फटका४यावर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला केंद्र शासनाने ६ हजार ९७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यामुळे ज्या शेतकºयांनी मुगाचे उत्पन्न घेतले. त्या शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, नाफेडने जिल्ह्यात कोठेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे ज्या शेतकºयांना पैशाची निकड होती, त्या शेतकºयांनी बाजार समितीतील व्यापाºयांना आपल्या शेतमालाची विक्री केली. व्यापाºयांनीही शेतकºयांच्या अडचणींचा फायदा घेत ४००० ते ४५०० रुपयांनीच मुगाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी