शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी : जायकवाडीच्या पाण्याच्या अनिश्चिततेने शेतकरी पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:20 IST

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे.पाथरी तालुक्यातील रबी हंगामातील दहा हजार हेक्टर सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, रबी हंगाम संपत आला तरीही अद्याप डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. यापूर्वी सोडण्यात आलेल्या संरक्षित पाणीपाळीमध्ये चार हजार हेक्टर खरीप हंगामातील पिकांचे सिंचन करण्यात आले. यावर्षी पाथरी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आॅक्टोबर महिन्यापासून भुगर्भातील पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पावसाळ्यामध्ये दोन महिने पाऊस पडला. उर्वरित दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे या भागात खरीप हंगामातील पिकांना उतारा आला नाही. तर पावसाअभावी पाणीपातळी खालावल्याने या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. राज्य शासनाने पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ परिस्थितीवर या भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आठ आवर्तन सोडण्याची मागणी सुुरुवातीपासूनच करण्यात आली आहे. गोदापात्रातील ढालेगाव आणि मुदगल येथील दोन्ही बंधारे मृत साठ्यावर येऊन ठेपले आहेत.या बंधाºयातून शेतकºयांनी सुरुवातीला सिंचनासाठी पाणी उपसा सुरू केला होता. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने शेतीसाठी होणाºया पाणी उपशावर निर्बंध घातले आहेत. गोदावरी पात्रातील बंधाºयावर टाकण्यात आलेल्या कृषीपंपाची वीज जोडणी महसूल यंत्रणेने तोडली आहे.पाथरी तालुक्याचा अर्धा अधिक भाग जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर येतो. यावर्षी जायकवाडी धरणात वरच्या धरणातील पाणी सोडले असले तरी सद्य स्थितीत २४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी सुरुवातीपासूनच केली जात आहे.साधारणत: पाथरी उपविभागांतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. मात्र सध्या जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सोडण्यात येणाºया पाण्याची अनिश्चितता कायम आहे. जायकवाडी धरणातून आॅक्टोबर महिन्यात दीड महिना संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. पाथरी उपविभागात ४ हजार हेक्टर सिंचन झाले. ऊस, कापूस, ज्वारी आणि गहू पेरणीसाठी याचा लाभ झाला.सध्या ही पिके बहरात आहेत. आता या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, अद्यापही पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्या शेतकºयांनी जायकवाडी कालव्यातील पाण्याच्या भरोशावर रबी हंगामातील पेरणी केली आहे. ते शेतकरी पेचात सापडले आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी शेतकºयातून होत आहे.बैठकीला मिळेना मुहूर्तजायकवाडी धरणातील पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय होतो. मात्र मागील दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठक झालीच नाही. जलसंपदामंत्री यांच्या उपस्थितीमध्ये १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक काही कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे सल्लागार समितीला बैठकीसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी