शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

परभणी : कारखाना प्रशासनाने दिली देयकांची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:00 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याची हमी साखर कारखान्याच्या प्रशासनाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याची हमी साखर कारखान्याच्या प्रशासनाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली़जिल्ह्यात ५ साखर कारखाने असून, या पाचही कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे़ ऊस गाळप होत असला तरी प्रत्यक्षात उसाचे देयके देण्यास विलंब लागत आहे़ त्याच प्रमाणे शासनाने एफआरपी प्रमाणे उसाची देयके अदा करावीत, असा आदेश दिला असतानाही एफआरपी प्रमाणे देयके मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या़ या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची बैठक पार पडली़ निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली़ रेणुका शुगर कारखान्याने १४ ते ३० नोव्हेंबर या काळातील देयके काढली असून, १ ते १५ डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपाचे पैसे ५ फेब्रुवारीपर्यंत आणि १५ ते ३१ डिसेंबरपर्यंतची रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे मान्य केले. नृसिंह साखर कारखान्याने आतापर्यंत एकाही ऊस उत्पादकाची रक्कम अदा केली नाही. आठ दिवसांत ऊस बिले देण्याचे मान्य केले. योगेश्वरी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर या काळात गाळप झालेल्या उसाचे पैसे २८ जानेवारीपर्यंत आणि १ ते १५ जानेवारी या काळातील ऊस गाळपाची रक्कम ५ फेब्रुवारीपर्यंत दिली जाईल, असे सांगितले. गंगाखेड साखर कारखान्याने १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंतची रक्कम २५ जानेवारी रोजी, १ ते ३० डिसेंबर या काळातील १० फेब्रुवारी आणि १ ते ३१ जानेवारी या काळातील ऊस गाळपाची रक्कम १५ फेब्रुवारीनंतर उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे सांगितले.बळीराजा कारखान्यानेही फेब्रुवारी महिन्यातील तारखा दिल्या आहेत. बैठकीस सिंगणापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, दैठणा, पोखर्णी, इंदेवाडी, वडगाव, पेगरगव्हाण, तांबसवाडी, उमरी आदी गावांतील ऊस उत्पादक उपस्थित होते.ंएफआरपीच्या अंमलबजावणीस टाळाटाळजिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यातील उसाचा उतारा सरासरी ११ टक्के येत असताना केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. केंद्राच्या जीएसटीचा निर्णय राज्य शासन रातोरात अंमलबजावणी करते. मग एफ.आर.पी.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा सवाल करीत शासनाविरुद्ध किसान सभा आंदोलन छेडणार असल्याचे कॉ.विलास बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी