शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

परभणी : कारखाना प्रशासनाने दिली देयकांची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:00 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याची हमी साखर कारखान्याच्या प्रशासनाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या उसाची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याची हमी साखर कारखान्याच्या प्रशासनाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिली़जिल्ह्यात ५ साखर कारखाने असून, या पाचही कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे़ ऊस गाळप होत असला तरी प्रत्यक्षात उसाचे देयके देण्यास विलंब लागत आहे़ त्याच प्रमाणे शासनाने एफआरपी प्रमाणे उसाची देयके अदा करावीत, असा आदेश दिला असतानाही एफआरपी प्रमाणे देयके मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या़ या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची बैठक पार पडली़ निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली़ रेणुका शुगर कारखान्याने १४ ते ३० नोव्हेंबर या काळातील देयके काढली असून, १ ते १५ डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपाचे पैसे ५ फेब्रुवारीपर्यंत आणि १५ ते ३१ डिसेंबरपर्यंतची रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे मान्य केले. नृसिंह साखर कारखान्याने आतापर्यंत एकाही ऊस उत्पादकाची रक्कम अदा केली नाही. आठ दिवसांत ऊस बिले देण्याचे मान्य केले. योगेश्वरी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर या काळात गाळप झालेल्या उसाचे पैसे २८ जानेवारीपर्यंत आणि १ ते १५ जानेवारी या काळातील ऊस गाळपाची रक्कम ५ फेब्रुवारीपर्यंत दिली जाईल, असे सांगितले. गंगाखेड साखर कारखान्याने १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंतची रक्कम २५ जानेवारी रोजी, १ ते ३० डिसेंबर या काळातील १० फेब्रुवारी आणि १ ते ३१ जानेवारी या काळातील ऊस गाळपाची रक्कम १५ फेब्रुवारीनंतर उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे सांगितले.बळीराजा कारखान्यानेही फेब्रुवारी महिन्यातील तारखा दिल्या आहेत. बैठकीस सिंगणापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, दैठणा, पोखर्णी, इंदेवाडी, वडगाव, पेगरगव्हाण, तांबसवाडी, उमरी आदी गावांतील ऊस उत्पादक उपस्थित होते.ंएफआरपीच्या अंमलबजावणीस टाळाटाळजिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यातील उसाचा उतारा सरासरी ११ टक्के येत असताना केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. केंद्राच्या जीएसटीचा निर्णय राज्य शासन रातोरात अंमलबजावणी करते. मग एफ.आर.पी.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा सवाल करीत शासनाविरुद्ध किसान सभा आंदोलन छेडणार असल्याचे कॉ.विलास बाबर यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी