शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:22 IST

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थ सहाय्यातून २००८ मध्ये परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेला मंजुरी मिळाली. मंजुरी देताना १०८ कोटी रुपयांची असलेली ही योजना पुढे २८८ कोटी रुपयांवर पोहचूनही १० वर्षानंतर अमृत योजनेतील १०२ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यातून आता पूर्णत्वाला जात आहे. परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ३० वर्षापूर्वीची ही योजना असून या काळात शहराची लोकसंख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीपुरवठा करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पारवा रोड परिसरातील चष्मे ए हयात विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तरी देखील शहरवासियांना पाण्यासाठी ओढाताण करावी लागते. सद्यस्थितीला १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेची शहरवासीय आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.युआयडीएसएसएमटी योजनेला अमृत योजनेतून निधी मंजूर झाल्यानंतर कामांना गती देण्यात आली. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्राधान्यक्रमाने ही योजना पूर्ण करुन घेतली. सद्यस्थितीला येलदरी येथील उद्भव विहीर, जलवाहिनी, धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र, परभणी शहरातील जलवाहिनी आणि विविध भागात उभारण्यात आलेले जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ चाचण्यांचा सोपस्कार बाकी असून त्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत मंगळवारी परभणी शहरात उभारलेल्या दोन एमबीआरमध्ये पाणी आणून चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने येलदरी धरणातील पाणी प्रथमच प्रत्यक्ष जलवाहिनीतून शहरात पोहचले. यापूर्वी येलदरी धरणाचेच पाणी नदीपात्रातून राहटी बंधाºयात घेतले जात होते आणि तेथून शहरवासियांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता थेट येलदरी धरणाचे पाणी जलवाहिनीतून परभणीकरांना मिळणार आहे. मंगळवारी सायंकाळी हे पाणी गणपती चौकातील जलवाहिनीपर्यंत पोहचले होते आणि रात्री उशिरापर्यंत विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एमबीआरमध्ये ते पोहचणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पाणी टंचाईलाही निरोप देण्याचा आनंद परभणीकरांना मिळणार आहे. नवीन वर्षामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा आशेचा किरणही मावळत्या वर्षाने दाखविला आहे.बटन दाबून सोडले पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बटन दाबून परभणी शहरात पाणी सोडण्यात आले. यावेळी रविंद्र सोनकांबळे, सुनिल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.एम.बी.आर.मध्ये पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून निघालेले पाणी परभणी शहरात दाखल होत असताना कॅनॉल परिसरात दोन ठिकाणी एअर वॉल्व्हमध्ये लिकेज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद करुन हे लिकेज काढण्यात आले. त्यांतर प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सायंकाळी विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एम.बी.आर.मध्ये रात्री दाखल झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी