शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:22 IST

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थ सहाय्यातून २००८ मध्ये परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेला मंजुरी मिळाली. मंजुरी देताना १०८ कोटी रुपयांची असलेली ही योजना पुढे २८८ कोटी रुपयांवर पोहचूनही १० वर्षानंतर अमृत योजनेतील १०२ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यातून आता पूर्णत्वाला जात आहे. परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ३० वर्षापूर्वीची ही योजना असून या काळात शहराची लोकसंख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीपुरवठा करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पारवा रोड परिसरातील चष्मे ए हयात विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तरी देखील शहरवासियांना पाण्यासाठी ओढाताण करावी लागते. सद्यस्थितीला १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेची शहरवासीय आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.युआयडीएसएसएमटी योजनेला अमृत योजनेतून निधी मंजूर झाल्यानंतर कामांना गती देण्यात आली. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्राधान्यक्रमाने ही योजना पूर्ण करुन घेतली. सद्यस्थितीला येलदरी येथील उद्भव विहीर, जलवाहिनी, धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र, परभणी शहरातील जलवाहिनी आणि विविध भागात उभारण्यात आलेले जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ चाचण्यांचा सोपस्कार बाकी असून त्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत मंगळवारी परभणी शहरात उभारलेल्या दोन एमबीआरमध्ये पाणी आणून चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने येलदरी धरणातील पाणी प्रथमच प्रत्यक्ष जलवाहिनीतून शहरात पोहचले. यापूर्वी येलदरी धरणाचेच पाणी नदीपात्रातून राहटी बंधाºयात घेतले जात होते आणि तेथून शहरवासियांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता थेट येलदरी धरणाचे पाणी जलवाहिनीतून परभणीकरांना मिळणार आहे. मंगळवारी सायंकाळी हे पाणी गणपती चौकातील जलवाहिनीपर्यंत पोहचले होते आणि रात्री उशिरापर्यंत विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एमबीआरमध्ये ते पोहचणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पाणी टंचाईलाही निरोप देण्याचा आनंद परभणीकरांना मिळणार आहे. नवीन वर्षामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा आशेचा किरणही मावळत्या वर्षाने दाखविला आहे.बटन दाबून सोडले पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बटन दाबून परभणी शहरात पाणी सोडण्यात आले. यावेळी रविंद्र सोनकांबळे, सुनिल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.एम.बी.आर.मध्ये पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून निघालेले पाणी परभणी शहरात दाखल होत असताना कॅनॉल परिसरात दोन ठिकाणी एअर वॉल्व्हमध्ये लिकेज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद करुन हे लिकेज काढण्यात आले. त्यांतर प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सायंकाळी विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एम.बी.आर.मध्ये रात्री दाखल झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी