शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

परभणी : स्वच्छता अभियान संपताच घनकचरा प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:35 IST

केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून देशभर शहरी भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ शहर अभियान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील अनेक शहरांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये परभणी महानगरपालिकेने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छतेमध्ये परभणी मनपाला पारितोषिक मिळाले नसले तरी नागरिकांना जलद प्रतिसाद व त्यांच्या समस्येचे निराकारण या प्रकारामध्ये मनपाला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याचा भव्य पुरस्कार वितरण समारंभही राज्याबाहेर झाला होता. या पुरस्कारानंतर शहरातील स्वच्छता अभियानाला आता आवकळा आल्याचे सातत्याने दिसून येत आहे. स्वच्छता अभियानाच्या कालावधीत शहरातील कचरा टाकण्याची जागा असलेल्या शहरातील धाररोडवरील डंपिंग ग्राऊंड परिसरात घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मनपाने सुरु केला होता. येथे घनकचºयापासून खत निर्मितीही करण्यात आली. मनपातील आकडेवारीनुसार जवळपास १७ क्विंटल खताची निर्मिती करण्यात आली. त्या माध्यमातून मनपाला जवळपास साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाल्याचेही सांगण्यात आले. जशी स्पर्धा संपली, तसा हा प्रकल्पही बंद पडला. त्यात तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्याने या प्रकल्पाकडे कोणीही पाहिले नाही. परिणामी आता शहरामध्ये दररोज निर्माण होणारा जवळपास ८० मे. टन कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये पडत आहे. परिणामी या परिसरात दररोज कचºयाचे ढिग वाढत चालले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात परभणीतही औरंगाबादप्रमाणे कचºयाची समस्या निर्माण होऊ शकते.कचºयाचे विलगीकरणही थांबलेमनपाच्या वतीने पूर्वी ओला आणि सुका असे कचºयाचे वर्गीकरण केले जात होते़ मुळात घंटागाड्यांमध्येच या पद्धतीने कचरा घेतला जात होता़ तो कचरा डम्पींग ग्राऊंडवर त्याच पद्धतीने टाकला जात होता; परंतु, आता स्वच्छता अभियान संपल्यानंतर कचºयाचे विलगीकरणही थांबविण्यात आले आहे़ परिणामी ओला आणि सुका दोन्ही कचरा एकत्रित संकलित केला जात आहे़धार रोडच्या डम्पिंग ग्राऊंडला विरोधसद्यस्थितीत परभणी शहरातील कचरा धार रोडवरील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो; परंतु, या परिसरातील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास विरोध आहे़ शिवाय काही नगरसेवकांनीही येथे कचरा टाकण्यास विरोध केला होता़ त्यामुळे हा कचरा बोरंवड शिवारातील मनपाच्या जागेत टाकण्याचा निर्णय झाला होता़निविदा बारगळल्याधाररोड भागात घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांची निविदा ५ मार्च रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीकोनातून तातडीने कारवाई होईल, अशी शहरवासियांची अपेक्षा होती; परंतु, प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.उलट ही प्रक्रिया सद्यस्थितीत ठप्प झाली आहे. मनपाच्या वतीने गंगाखेड रोडवरील बोरवंड परिसरात २.४८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली असून या भागात भविष्यकाळात घनकचरा प्रकल्प उभारण्याचे मनपाचे नियोजन आहे.यासाठी जवळपास १९ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु, याबाबतही कोणतीही प्रक्रिया मनपाकडून पुढे सरकली नाही. परिणामी शहराच्या घनकचºयाचा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार