शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:28 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ राज्य शासनाने जिल्ह्यात पूर्णा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, या तालुक्यात दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करणे अपेक्षित आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय कोलमडला असून, शेतशिवारांमध्ये कामे शिल्लक नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतीवर अवलंबून असणाºया मजुरांनाही कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये या मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविली जाते़ ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जातात़ मजुरांनी कामाची मागणी करताच त्यांना काम उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य या विभागाचे आहे; परंतु, जानेवारी महिन्यापर्यंत रोजगार हमी योजनेकडे काम मागण्यासाठी मजूर फिरकत नसल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली होती़ ग्रामीण भागातून शहरी भागात आणि पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्येही मजुरांचे स्थलांतर वाढले होते़ ग्रामीण भागातील हे मजूर पर जिल्ह्यात कामासाठी जात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र रोहयोकडे काम मागितले जात नव्हते़ त्यामुळे या योजनेतील त्रुटी शोधण्याची वेळ प्रशासनावर आली होती़मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने रोहयोच्या कामावर लक्ष केंद्रीत केले असून, कामांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यामध्ये जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची ८६५ कामे सुरू होती़या कामांवर २९ हजार १६९ मजूर काम करीत होते़ त्या पुढील आठवड्यात कामांची संख्या वाढली आहे़ १४ ते २० फेब्रुवारी या काळात १ हजार ७५ कामे सुरू असून, ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत काम उपलब्ध झाले आहे़ त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ८५८ कामे सुरू असून, ३१ हजार ३३२ मजुरांना काम मिळाले तर विविध शासकीय यंत्रणांची २१७ कामे सुरू असून, त्यावर ५ हजार ११८ मजूर काम करीत आहेत़ एकंदर फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोजगार हमी योजनेकडे मजुरांचा ओढा अल्पशा प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे; परंतु, जिल्ह्यातील एकंदर दुष्काळाची परिस्थिती, रोजगाराची समस्या लक्षात घेता अजूनही मजुरांचा कल रोहयोकडे वाढत नसल्याचेच दिसत आहे़गंगाखेड तालुक्यात वाढली कामेरोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात कामे घेतली जात आहेत़ त्यात गंगाखेड तालुक्याने मोठी आघाडी घेतली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात केवळ ७ कामे सुरू होती़ या कामांवर ३२१ मजूर काम करीत होते़ तर १४ ते २० फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात ११० कामे सुरू झाली असून, २ हजार ९३४ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़ पाथरी तालुक्यात मागील आठवड्यात केवळ १२ कामे सुरू होती़ चालू आठवड्यामध्ये या तालुक्यात ३२ कामे सुरू झाली असून, ३१५ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ