शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परभणी : अर्धवट रस्त्यामुळे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:52 IST

ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य ग्रामीण मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केले; परंतु, या रस्ता कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य ग्रामीण मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केले; परंतु, या रस्ता कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत़ तालुक्यातील नाथ्रा ते नाथ्रा फाटा या १२ किमी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्यावर पावसात चिखल होत आहे़ परिणामी या रस्त्यावरील वाहतूक बंद होत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़पाथरी-आष्टी या राज्य रस्त्यावर हादगावच्या पुढे नाथ्रा फाटा आहे़ नाथ्रा फाटा ते नाथ्रा हा १२ किमीचा रस्ता आहे़ या रस्त्यावर नाथ्रा गावासह कासापुरी, जवळा झुटा, पाथरगव्हाण, केदार वस्ती या गावातील वाहतूक आहे़ मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या भागातील रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली होती़ रस्ता खराब असल्याने अनेक वेळा नाथ्रा येथील ग्रामस्थ गोदावरी नदीच्या पलीकडे माजलगाव तालुक्यातील गावातून ये-जा करीत असत़मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या १२ किमी रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा २ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता़ गतवर्षी ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरूही केले होते़ डिसेंबर २०१८ मध्ये रस्त्याच्या मधोमधच्या भागामध्ये खडी टाकून रस्ता काम सुरू केले़ परंतु, काही दिवसांतच रस्त्याचे काम सुरू केले़ त्यामुळे या भागातील ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला़ उन्हाळ्याच्या शेवटी एप्रिल, मे महिन्यामध्ये पुन्हा रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू झाले़ १२ किमी रस्ता मजबुतीकरण करण्यात आल्यानंतर बाजूने टाकलेला मुरूम भर पावसाळ्यात रहदारीसाठी अडथळा निर्माण करू लागला आहे़कामाच्या दर्जाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे़ थोडासा पाऊस पडला की, चारचाकी, दुचाकी वाहने या रस्त्यावरून नेता येत नाहीत़ विशेष म्हणजे, या भागातून शहरात शिक्षणासाठी येणाºया शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिंनीची संख्या मोठी आहे़ दररोज २०० विद्यार्थी ये-जा करतात़ परंतु, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत़ त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावरील एसटी महामंडळाची धावणारी बस बंद होते़ परिणामी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने शाळा सोडून घरी बसावे लागत आहे़मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार नित्याचाच होत असल्याने नाथ्रा फाटा ते नाथ्रा या १२ किमी रस्त्यावरील येणाºया गावांतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़; परंतु, शिवस्वराज्य, महाजनादेश यात्रेत मग्न असलेल्या लोकप्रतिनिधींना मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचेच दिसून येत आहे़थोड्याही पावसाने बससेवा होते बंद४पाथरी आगारातून पाथरी ते नाथ्रा आणि पाथरी ते कासापुरी या बस दिवसभरात पहाटे ६़३० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेºया मारतात़ त्याचबरोबर या बसेसला गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकासची बसही याच रस्त्यावरून धावते़४७ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला रस्ता वाहतुकीसाठी व प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ होईल, या अपेक्षेवर असलेल्या ग्रामस्थांना मात्र आपल्या अपेक्षेवर पाणीच फेरावे लागले आहे़ कारण नाथ्रा व परिसरात थोडासा पाऊस झाला की पाथरी आगारातून धावणाºया या बसेसला सुटी दिली जाते़ परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो़जि़प़ प्रशासनाचे दुर्लक्ष४नाथ्रा ते नाथ्रा फाटा या १२ किमी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे़ त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणे जि़प़ प्रशासनाचे काम होते़; परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या रस्त्याचे ना काम पूर्ण झाले ना रस्ता तयार करताना कामाची गुणवत्ता राखली गेली़ तेव्हा जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकEducationशिक्षणStudentविद्यार्थी